शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

12 मिनिटं उशीर झाल्याने गृहमंत्र्यांनी घेतली अधिका-यांची "शाळा"

By admin | Updated: April 20, 2017 19:50 IST

राजधानी दिल्लीतील एक कार्यक्रम आज ठरलेल्या वेळेच्या 12 मिनिट उशीराने सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग चांगलेच नाराज झाले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20- राजधानी दिल्लीतील एक कार्यक्रम आज ठरलेल्या वेळेच्या 12 मिनिट उशीराने सुरू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग चांगलेच नाराज झाले. यावेळी त्यांनी देशातील नोकरदारांना वेळेचं महत्व आणि वेळेचं पालन करण्याचं आवाहन केलं.
 
दिल्लीमध्ये आज सिव्हील सेवा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार होता. कार्यक्रमासाठी राजनाथ सिंग 5 मिनिट आधी पोहोचले, पण कार्यक्रम मात्र, 12 मिनिट उशीरा म्हणजे 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्रालयाचे अधिकारी आणि काही मुख्य अधिकारी सहभागी झाले होते.  
 
विज्ञान भवनातील या कार्यक्रमाला उशीर झाल्याने राजनाथ यांनी अधिका-यांसमोर जाहीर नाराजी व्यक्त केली. मी 5 मिनिट आधी आलो होतो पण कार्यक्रमाला उशीर झाल्याने थोडी काळजी वाटली. हा कार्यक्रम वेळेवर सुरू झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं. आपल्यामध्ये काही कमतरता आहे का याचा विचार करायला हवा, आपल्याला जबाबदारीचं भान असायला हवं. तसेच आपण सर्वांनी वेळेचं महत्व आणि वेळेचं पालन करणं गरजेचं आहे असं राजनाथ म्हणाले.