शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठराव अंमलबजावणीबाबत प्रतिज्ञापत्र उपमहापौरांचा दावा : आयुक्तांसह अधिकार्‍यांची फौज औरंगाबादला

By admin | Updated: December 18, 2015 00:28 IST

जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्‍या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकार्‍यांची फौज गुरूवारी औरंगाबादला दाखल झाली. याप्रकरणात २१ रोजी कामकाज होणार आहे.

जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्‍या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकार्‍यांची फौज गुरूवारी औरंगाबादला दाखल झाली. याप्रकरणात २१ रोजी कामकाज होणार आहे.
सर्वच पक्षांनी निवडणुकीत लोकांना जाहीरनामा देऊन ही कामे करू, अशी आश्वासने दिली आहेत. आता ती कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने काही ठराव करतो, तर त्याची अंमलबजावणी होत नाही. एकमताने मंजूर झालेले ठराव शासनाकडून विखंडितही झालेले नसताना आयुक्तांकडून त्यावर अंमलबजावणीच होत नाही. त्यावर न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचा इशारा महासभेत देण्यात आला होता.
त्यानुसार उपमहापौर सुनील महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात मनपा आयुक्तांना प्रतिज्ञापत्र दाखल करावयाचे असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू होती.
----- इन्फो----
माहिती गोळा करण्यासाठी उडाली धावपळ
याचिकेत महासभेने केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आयुक्तांची आहे. त्यानुसार किती ठरावांची अंमलबजावणी झाली. किती बाकी आहे? याबाबतची माहिती या प्रतिज्ञापत्रासाठी आयुक्तांना आवश्यक होती. त्यामुळे सर्व विभागांकडून ही माहिती मागविण्यासाठी एक फॉरमॅटच ठरवून दिला होता. त्यात ठराव क्रमांक व दिनांक, तपशील व त्याच्या अंमलबजावणी झाली का? झाली नसल्यास का झाली नाही? किंवा विखंडनाला पाठविला का? आदीबाबतचा खुलासा असे तीन कॉलम देऊन त्यात माहिती मागविण्यात आली. ही माहिती गोळा करण्यासाठी मनपाच्या सर्वच विभागांची चांगलीच धावपळ झाली. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. ही माहिती संकलीत केल्यानंतर आयुक्तांसह प्रमुख अधिकारी गुरूवारी पहाटेच औरंगाबादला रवाना झाले.
----- इन्फो----
अधिकार्‍यांची फौज रवाना
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह उपायुक्त प्रदीप जगताप, नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात, मुख्य लेखापरिक्षक सुभाष भोर, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनील भोळे, पाणीपुरवठा अभियंता डी.एस. खडके हे गुरूवारी तातडीने औरंगाबादला रवाना झाले. एखाद्या विभागासंदर्भातील ठरावाबाबत काही मुद्दे लागल्यास अडचण नको म्हणून हा फौजफाटा आयुक्तांनी सोबत नेल्याचे समजते.