शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठराव अंमलबजावणीबाबत प्रतिज्ञापत्र उपमहापौरांचा दावा : आयुक्तांसह अधिकार्‍यांची फौज औरंगाबादला

By admin | Updated: December 18, 2015 00:28 IST

जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्‍या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकार्‍यांची फौज गुरूवारी औरंगाबादला दाखल झाली. याप्रकरणात २१ रोजी कामकाज होणार आहे.

जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्‍या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकार्‍यांची फौज गुरूवारी औरंगाबादला दाखल झाली. याप्रकरणात २१ रोजी कामकाज होणार आहे.
सर्वच पक्षांनी निवडणुकीत लोकांना जाहीरनामा देऊन ही कामे करू, अशी आश्वासने दिली आहेत. आता ती कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने काही ठराव करतो, तर त्याची अंमलबजावणी होत नाही. एकमताने मंजूर झालेले ठराव शासनाकडून विखंडितही झालेले नसताना आयुक्तांकडून त्यावर अंमलबजावणीच होत नाही. त्यावर न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचा इशारा महासभेत देण्यात आला होता.
त्यानुसार उपमहापौर सुनील महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात मनपा आयुक्तांना प्रतिज्ञापत्र दाखल करावयाचे असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू होती.
----- इन्फो----
माहिती गोळा करण्यासाठी उडाली धावपळ
याचिकेत महासभेने केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आयुक्तांची आहे. त्यानुसार किती ठरावांची अंमलबजावणी झाली. किती बाकी आहे? याबाबतची माहिती या प्रतिज्ञापत्रासाठी आयुक्तांना आवश्यक होती. त्यामुळे सर्व विभागांकडून ही माहिती मागविण्यासाठी एक फॉरमॅटच ठरवून दिला होता. त्यात ठराव क्रमांक व दिनांक, तपशील व त्याच्या अंमलबजावणी झाली का? झाली नसल्यास का झाली नाही? किंवा विखंडनाला पाठविला का? आदीबाबतचा खुलासा असे तीन कॉलम देऊन त्यात माहिती मागविण्यात आली. ही माहिती गोळा करण्यासाठी मनपाच्या सर्वच विभागांची चांगलीच धावपळ झाली. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. ही माहिती संकलीत केल्यानंतर आयुक्तांसह प्रमुख अधिकारी गुरूवारी पहाटेच औरंगाबादला रवाना झाले.
----- इन्फो----
अधिकार्‍यांची फौज रवाना
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह उपायुक्त प्रदीप जगताप, नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात, मुख्य लेखापरिक्षक सुभाष भोर, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनील भोळे, पाणीपुरवठा अभियंता डी.एस. खडके हे गुरूवारी तातडीने औरंगाबादला रवाना झाले. एखाद्या विभागासंदर्भातील ठरावाबाबत काही मुद्दे लागल्यास अडचण नको म्हणून हा फौजफाटा आयुक्तांनी सोबत नेल्याचे समजते.