शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

ऐन दुष्काळात मटक्याचा झटका

By admin | Updated: April 8, 2016 00:05 IST

शिवराज बिचेवार, नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़

शिवराज बिचेवार,  नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़ ऋतु कोणताही असो, परिस्थिती काहीही असो परंतु कल्याण-मिलनच्या या खेळावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस यंत्रणेला अपयश येत असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होत आहेत़ जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून मटक्याचा हा व्यवसाय सुरु आहे़ या अवैध धंद्याबाबत थोडा गाजावाजा झाला की, लगेच पोलिस प्रशासनाकडून किरकोळ बुकीवर कारवाई करुन आपली पाठ थोपटण्यात येते़ परंतु या व्यवसायाचे बडे मासे मोकळेच राहतात़ त्यात अशा कारवाईनंतर प्रत्यक्षात पुन्हा फायदा पोलिसांचाच होत असल्याचेही बुकीचे म्हणणे आहे़ नांदेड शहरात लोकमत चमुने पाहणी केली असता, सर्वच ठिकाणी मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याचे पहावयास मिळाले़ शहरातील शिवाजीनगर भागात एका टपरीवर काही मिनिटांच्या अवधीने चोरट्या पावलाने एक-एक जण येत होता़ अन् आपले आकडे सांगून निघून जात होता़ असाच प्रकार गोकुळनगर, अण्णाभाऊ साठे चौक, गणेशनगर वाय पॉर्इंट, जयभीनगर, नवी आबादी, तेहरानगर आदी परिसरात पहायला मिळाला़ प्रत्येक ठिकाणी पानटपरी, छोटे किराणा दुकान, टेलरिंगचे दुकान, केश कर्तनालय, चहाची टपरी या ठिकाणी सर्रासपणे मटका स्विकारला व लावला जात असल्याचे पहावयास मिळाले़ शहरात आजघडीला अशाप्रकारचे २०० हून अधिक मटक्याचे अड्डे असल्याचे आढळले़ झोपडपट्टी भागात मटक्याचे व्यसन अनेकांना असल्याचे दिसत आहे़ १५० ते २०० रुपये रोजंदारीवर काम करणारे बहुतेक मजूर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दिवसातून एक तरी, आकडा लावून नशीब आजमावित असल्याचे दिसून येते़ परंतु दिवसेंदिवस झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कुटुंबे उद्धवस्त झाली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनाही मटका बुकींची इत्यंभूत माहिती असते़ अवैध व्यवसायातही आधुनिकताआजघडीला सर्वत्र मोबाईल, इंटरनेटचा वापर करण्यात येत आहे़ मटक्याच्या अवैध व्यवसायातही मोबाईल आणि इंटरनेटमुळे मटका बुकी आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे़ यापूर्वी आपण लावलेला आकडा आला की नाही? किंवा तो लावण्यासाठी मटका बुकींकडे जावे लागत होते़ परंतु आता मोबाईलवरुन मटका स्विकारणे आणि लावणे सुरु आहे़ त्याचबरोबर इंटरनेटवर बसून कुठेही नेमका कोणता आकडा आला अन् किती रुपयांचा आला याचीही माहिती मिळत आहे़ कल्याण-मिलनजिल्ह्यात दुष्काळामुळे एक-एक व्यवसाय बंद पडत आहेत़ बाजारात आर्थिक उलाढाल नसल्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत़ शेतकऱ्यांनी तर कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखा मार्ग स्विकारला आहे़ अशा परिस्थितीत अवैध इमानदारीचा हा धंदा मात्र तेजीत आहे़ गल्ली बोळासह उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातही आता धंद्याने पाय पसरले आहेत़ पोलिस प्रशासन जोपर्यंत गंभीरपणे अशा जुगाऱ्यांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत या व्यवसायाचे समुळ उच्चाटन होणे शक्य नाही़