शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया विका, निती आयोगाचा सल्ला

By admin | Updated: May 31, 2017 08:52 IST

नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 31 - नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे. सध्या तोटयात असलेल्या एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक केली तर, सरकारचा पैसा वाचेल आणि तोच पैसा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी वापरता येईल असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
 
या अहवालामुळे केंद्र सरकारला निर्गुतवणूकीची प्रक्रिया सुरु करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा नुकसानीमध्ये चालणा-या एअर इंडियाच्या विक्रीला पाठिंबा दिला आहे. एअर इंडियासंबंधी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 
 
निती आयोगाने एअर इंडियासंबंधी चौथा अहवाल सरकारला दिला असून त्यामध्ये निर्गुतवणूकीच्या प्रक्रियेच्या रोडमॅप असू शकतो. एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज असून, 21 हजार कोटींचे कर्ज विमानासंबंधी तर, 8 हजार कोटींचे भांडवली कर्ज आहे. एअर इंडियाच्या नव्या मालकाकडे ही दोन्ही कर्जे ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 
 
एअर इंडियाला आतापर्यंत 40 हजार कोटींचा तोटा झाला असून, चालू आर्थिकवर्षात 3 हजार कोटी रुपयांच्या रोख रक्कमेची कमतरता भासणार आहे. 2015-16 वर्षात एअर इंडियाचे ऑपरेटींग नफा 105 कोटी होता. पण नफ्याचा हा आकडा कायम राहणार नसल्याचा अंदाज आहे. 
 
मागच्या पाचवर्षात एअर इंडिया चालवण्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपये खर्च केले असून, पुढच्या काहीवर्षात इतकीच रक्कम खर्च करावी लागणार आहे. केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री गजपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी निती आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. पण त्या काय आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही. 
 
आम्हाला एअर इंडियाचा अभिमान असून सर्व पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. एअर इंडियाला व्यवहार्य बनवण्यासाठी निती आयोगाने काही कठोर उपाय सुचवले आहेत असे राजू यांनी सरकारच्या तिस-यावर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
एअर इंडिया मालमत्ता विकणार ?
एअर इंडियाच्या मुंबई, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथील काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि फ्लॅटची विक्री करण्यात येईल असे समजते. सात मालमत्ता विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्यापोटी ८0 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.