शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एअर इंडिया विका, निती आयोगाचा सल्ला

By admin | Updated: May 31, 2017 08:52 IST

नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 31 - नियोजन आणि विकासात महत्वाची भूमिका असलेल्या निती आयोगाने केंद्र सरकारला एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक करण्याची शिफारस केली आहे. सध्या तोटयात असलेल्या एअर इंडियामध्ये निर्गुतवणूक केली तर, सरकारचा पैसा वाचेल आणि तोच पैसा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी वापरता येईल असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 
 
या अहवालामुळे केंद्र सरकारला निर्गुतवणूकीची प्रक्रिया सुरु करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा नुकसानीमध्ये चालणा-या एअर इंडियाच्या विक्रीला पाठिंबा दिला आहे. एअर इंडियासंबंधी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 
 
निती आयोगाने एअर इंडियासंबंधी चौथा अहवाल सरकारला दिला असून त्यामध्ये निर्गुतवणूकीच्या प्रक्रियेच्या रोडमॅप असू शकतो. एअर इंडियावर 60 हजार कोटींचे कर्ज असून, 21 हजार कोटींचे कर्ज विमानासंबंधी तर, 8 हजार कोटींचे भांडवली कर्ज आहे. एअर इंडियाच्या नव्या मालकाकडे ही दोन्ही कर्जे ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 
 
एअर इंडियाला आतापर्यंत 40 हजार कोटींचा तोटा झाला असून, चालू आर्थिकवर्षात 3 हजार कोटी रुपयांच्या रोख रक्कमेची कमतरता भासणार आहे. 2015-16 वर्षात एअर इंडियाचे ऑपरेटींग नफा 105 कोटी होता. पण नफ्याचा हा आकडा कायम राहणार नसल्याचा अंदाज आहे. 
 
मागच्या पाचवर्षात एअर इंडिया चालवण्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपये खर्च केले असून, पुढच्या काहीवर्षात इतकीच रक्कम खर्च करावी लागणार आहे. केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री गजपती राजू आणि जयंत सिन्हा यांनी निती आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. पण त्या काय आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती दिलेली नाही. 
 
आम्हाला एअर इंडियाचा अभिमान असून सर्व पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. एअर इंडियाला व्यवहार्य बनवण्यासाठी निती आयोगाने काही कठोर उपाय सुचवले आहेत असे राजू यांनी सरकारच्या तिस-यावर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
एअर इंडिया मालमत्ता विकणार ?
एअर इंडियाच्या मुंबई, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथील काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि फ्लॅटची विक्री करण्यात येईल असे समजते. सात मालमत्ता विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्यापोटी ८0 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.