शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आडवाणी, जोशींवर टांगती तलवार ?

By admin | Updated: March 7, 2017 06:09 IST

१३ नेत्यांवर अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या कटकारस्थानात सामील असल्याच्या आरोपावरून फौैजदारी खटला चालणार की नाही याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली : लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग व उमा भारती यांच्यासह भाजपा व संघ परिवाराशी संबंधित १३ नेत्यांवर अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या कटकारस्थानात सामील असल्याच्या आरोपावरून फौैजदारी खटला चालणार की नाही याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयात नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे.दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद उद््ध्वस्त केल्यानंतर त्यासंबंधीचे दोन खटले लखनऊ आणि रायबरेली येथील फौजदारी न्यायालयात प्रलंबित आहेत. रायबरेली न्यायालयाने खटल्याचे विभाजन करून बाबरी पाडण्यास प्रक्षोभक स्थिती तयार करणे व प्रत्यक्ष वास्तू पाडणे असे दोन खटले केले. आडवाणी, जोशी, उमा भारती, कल्याण सिंग यांच्यासह १३ नेत्यांना कटकारस्थानातून आरोपमुक्त केले. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम केला. यानंतर कित्येक वर्षांनी सीबीआयने यास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. कोर्टाने आडवाणींसह इतर आरोपींना दोन वर्षांपूर्वी नोटिसाही काढल्या. हे प्रकरण सोमवारी न्या. पिनाकी चंद्र घोष व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आले, तेव्हा या आरोपींवर काढून टाकलेला कटकारस्थानाचा आरोप पुन्हा ठेवून खटला चालवावा का, यावर २२ मार्चला सुनावणी घेण्याचे ठरविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पुढे काय होणार?कटकारस्थानाचा आरोप काढून टाकण्यास समर्थनीय कारण दिसले नाही, तर हा आरोप पुनरुज्जीवित करून खटला चालविण्याचा आपण आदेश देऊ, असे न्यायालयाने सूचित केले. तसेच लखनऊ व रायबरेली येथील दोन्ही खटले एकत्र करून चालविण्याचाही आदेश दिला जाऊ शकेल, असेही संकेत दिले गेले. तसेच लखनऊ व रायबरेली येथील दोन्ही खटले एकत्र करून चालविण्याचाही आदेश दिला जाऊ शकेल, असेही संकेत दिले गेले. अर्थात, या दोन्ही मुद्द्यांवर आडवाणींसह इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच निर्णय होईल. असे असले तरी गेली २४ वर्षे रेंगाळलेल्या या खटल्याची निर्णय स्थिती लवकरच येईल, असे दिसते.>‘सीबीआय’च्या भूमिकेकडे लक्षमुळात ‘सीबीआय’ने हे अपिल करण्याचा विलंबाने निर्णय घेतला तेव्हाची व आताची परिस्थिती वेगळी आहे. हे १३ आरोपी ज्या पक्षाशी व परिवाराशी संबंधित आहेत त्यांच्या हाती आता देशाची सत्ता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर बाबरी पाडण्याच्या कटाचा खटला चालविण्यासाठी ‘सीबीआय’ आता किती आग्रही भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आरोपींना आरोपमुक्त करण्याविरुद्ध ‘सीबीआय’खेरीज हाजी मेहबूब अहमद या खासगी व्यक्तीनेही अपील केले आहे व त्यात इतर कायदेशीर मुद्द्यांखेरीज ही बदललेली परिस्थितीही अधोरेखित केली गेली आहे.