शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

अडवाणींचे पुन्हा टीकास्त्र

By admin | Updated: June 29, 2015 00:10 IST

नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगत लालकृष्ण आडवाणींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून केंद्रातील रालोआ सरकार आणि भाजपला अडचणीत टाकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून अडवाणी यांनी ललितगेट प्रकरणात आरोप लावण्यात येत असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अप्रत्यपणे राजीनामा देण्याचा सल्ला दिला.आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्यावरून स्वराज व राजे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असतानाच अडवाणी म्हणाले की, ‘सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक आहे. हवाला कांडात माझे नाव गोवण्यात आले त्यावेळी मी लगेच पदाचा राजीनामा दिला होता.’ एका दैनिकाला मुलाखत देताना अडवाणी बोलत होते. ‘१९९६ मध्ये हवाला कांडप्रकरणी माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. हे आरोप खोटे ठरल्यानंतर मी परत संसदेत आलो,’ असे ते म्हणाले. ‘जेव्हा जैन डायरीच्या आधारावर हवाला कांड प्रकरणात माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते, तेव्हा पंडारा मार्गावरील आपल्या निवासस्थानी बसलेला असताना सायंकाळी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी तात्काळ अटलबिहारी वाजपेयी यांना फोन करून आपला निर्णय कळविला. त्यांनी मला राजीनामा देऊ नका, अशी सूचनाही केली. जनता निवडणुकीत आम्हाला मतदान करते. त्यामुळे जनतेप्रती प्रतिज्ञाबद्धता असणे आवश्यक आहे,’ असे अडवाणी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वराज आणि राजेंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे -काँग्रेसहवाला घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या मंत्र्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वराज आणि राजे यांनीही आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी.सी. चाको म्हणाले.४राजीनामा देण्याचा नियम असला पाहिजे का, असे विचारले असता अडवाणी म्हणाले की, मी माझ्याबाबतीत सांगू शकतो. दुसरे काय करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा काय मुद्दा आहे, हे मला ठाऊक नाही. जनसंघाच्या आधीपासूनच संघाच्या शाखांमधून आम्हाला प्रामाणिकपणाचे धडे दिले जात होते आणि प्रामाणिकपणा हाच सर्वांत मोठा सद्गुण असल्याचे सांगण्यात येत होते. भ्रष्टाचाराबाबत कसलाही समझोता केला जाऊ नये.सत्तारूढ भाजप राजकीय नीतिमत्ता व प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालण्यास तयार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अडवाणी यांनीही याबाबत सावध केले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांना वाचवायचे आहे. कारवाई केली तर ही प्रक्रिया आणखी वेग घेईल, अशी भाजपला भीती वाटत आहे. -नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार