शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

अडवाणींचे पुन्हा टीकास्त्र

By admin | Updated: June 29, 2015 00:10 IST

नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगत लालकृष्ण आडवाणींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून केंद्रातील रालोआ सरकार आणि भाजपला अडचणीत टाकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून अडवाणी यांनी ललितगेट प्रकरणात आरोप लावण्यात येत असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अप्रत्यपणे राजीनामा देण्याचा सल्ला दिला.आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्यावरून स्वराज व राजे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असतानाच अडवाणी म्हणाले की, ‘सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक आहे. हवाला कांडात माझे नाव गोवण्यात आले त्यावेळी मी लगेच पदाचा राजीनामा दिला होता.’ एका दैनिकाला मुलाखत देताना अडवाणी बोलत होते. ‘१९९६ मध्ये हवाला कांडप्रकरणी माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. हे आरोप खोटे ठरल्यानंतर मी परत संसदेत आलो,’ असे ते म्हणाले. ‘जेव्हा जैन डायरीच्या आधारावर हवाला कांड प्रकरणात माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते, तेव्हा पंडारा मार्गावरील आपल्या निवासस्थानी बसलेला असताना सायंकाळी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी तात्काळ अटलबिहारी वाजपेयी यांना फोन करून आपला निर्णय कळविला. त्यांनी मला राजीनामा देऊ नका, अशी सूचनाही केली. जनता निवडणुकीत आम्हाला मतदान करते. त्यामुळे जनतेप्रती प्रतिज्ञाबद्धता असणे आवश्यक आहे,’ असे अडवाणी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वराज आणि राजेंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे -काँग्रेसहवाला घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या मंत्र्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वराज आणि राजे यांनीही आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी.सी. चाको म्हणाले.४राजीनामा देण्याचा नियम असला पाहिजे का, असे विचारले असता अडवाणी म्हणाले की, मी माझ्याबाबतीत सांगू शकतो. दुसरे काय करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा काय मुद्दा आहे, हे मला ठाऊक नाही. जनसंघाच्या आधीपासूनच संघाच्या शाखांमधून आम्हाला प्रामाणिकपणाचे धडे दिले जात होते आणि प्रामाणिकपणा हाच सर्वांत मोठा सद्गुण असल्याचे सांगण्यात येत होते. भ्रष्टाचाराबाबत कसलाही समझोता केला जाऊ नये.सत्तारूढ भाजप राजकीय नीतिमत्ता व प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालण्यास तयार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अडवाणी यांनीही याबाबत सावध केले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांना वाचवायचे आहे. कारवाई केली तर ही प्रक्रिया आणखी वेग घेईल, अशी भाजपला भीती वाटत आहे. -नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार