शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बोडो हत्याकांडाचा निषेध करणा-या आदिवासी- पोलिसांत चकमक, ५ ठार

By admin | Updated: December 24, 2014 15:09 IST

सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करणा-या स्थानिक आदिवासी व पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकीत ५ आदिवासी ठार झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत

गुवाहाटी, दि. २४ - सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात अतिरेक्यांनी हल्ला करून ६० हून अधिक नागरिकांना निर्घृणपणे ठार मारल्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करणारे आदिवासी व पोलिसांत चकमक झाली, ज्यात पाच आदिवासी ठार झाले. पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले आहेत. पोलिस व आदिवासींमधील धुमश्चक्री अद्याप कायम आहे. 
मंगळवारी संध्याकाळी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार करत निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासींनी आंदोलन करत सोनितपूर जिल्ह्यातील फुलगौरी भागातील बोडो नागरिकांवर चालून जात त्यांची घेर जाळली. सशस्त्र पोलिसांनी संतप्त आदिवासींना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यात पाच आदिवासी मृत्यूमुखी पडले आणि परिस्थिती आणखीनच चिघळली.
दरम्यान सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी मंगळवारी संध्याकाळी उच्छाद मांडला, त्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील ६० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. काल संध्याकाळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले.
 
एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करीत एकट्या सोनितपूरमध्ये ३० जणांना ठार केले. त्यात विश्वनाथ चारीयाली व धेकियाजुली येथील अनेक नागरिकांचा समावेश आहे. तर कोक्राझारमध्ये चार आदिवासी मारले गेले. हल्ला झाला ते स्थळ आसाम आणि अरुणाचल च्या सीमेजवळ आहे. कोक्राझारच्या उल्टापानी या भागात नक्षलवाद्यांनी सहा ग्रेनेडचा स्फोट घडवला. 
दरम्यान आसाममधील माओवाद्यांचे कृत्य दहशतवाद्यांसारखे, त्यांना दहशतवादी म्हणूनच हाताळायला हवे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.  आसाममध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची तुकडी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.