शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.
यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता राजेश कुमार, मुख्य अभियंता इलेक्ट्रीक वाय. पी. सिंग, उपमुख्य अभियंता एस.डी. मीना (जळगाव), ठेकेदार एल. के. गोयल यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने या मार्गावरील वाहतुकीची गती वाढणार आहे. यामुळे चाकरमनी, व्यवसायिक व प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बतच होणार आहे. दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावरुन वाहतूक धिम्या गतीने होत होती. मार्गा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी १० ते १७मार्च दरम्यान रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणारी सायंकाची भुसावळ -सुरत पॅसेंजर बंद ठेवण्यात आली होती.
वर्षभरापूर्वीच झाले काम
उधना-जळगाव मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. पाळधी ते धरणगाव या १९ कि. मी. च्या रेल्वे मार्गाचे कामपूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ ची मुदत देण्यात आली होती. मात्र तब्बल एक वर्षापूर्वीच या मार्गाचे काम करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे जळगाव -उधना, सुरत मार्गावरचा प्रवासात आर्ध्यातासांची बचत होणार आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये याच मार्गावरील धरणगाव ते अमळनेर या २४ कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
१४४ किमीचे काम पूर्ण
जळगाव -उधना या ३०४ रेल्वे मार्गावर आता पर्यंत बारडोली ते चिंचपाड ९० कि.मी.,अमळनेर ते धरणगाव २५ व धरणगांव ते पाळधी १९ कि.मी. अशा जवळपास १४४ कि.मी. मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पाळधी -जळगावचे काम अपूर्ण
पाळधी ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील दूध फेडरेशन समोरील झोपडप˜ी भागातील २०० मीटर रुळाचे काम बाकी आहे. झोपडप˜ीचे अतिक्रमण निघाल्यावर या लाईनचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाळधी ते जळगाव या १० की.मी मार्गवरुन रेल्वे धावणे अद्याप बाकी आहे.