शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.
यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता राजेश कुमार, मुख्य अभियंता इलेक्ट्रीक वाय. पी. सिंग, उपमुख्य अभियंता एस.डी. मीना (जळगाव), ठेकेदार एल. के. गोयल यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने या मार्गावरील वाहतुकीची गती वाढणार आहे. यामुळे चाकरमनी, व्यवसायिक व प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बतच होणार आहे. दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावरुन वाहतूक धिम्या गतीने होत होती. मार्गा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी १० ते १७मार्च दरम्यान रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणारी सायंकाची भुसावळ -सुरत पॅसेंजर बंद ठेवण्यात आली होती.
वर्षभरापूर्वीच झाले काम
उधना-जळगाव मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. पाळधी ते धरणगाव या १९ कि. मी. च्या रेल्वे मार्गाचे कामपूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ ची मुदत देण्यात आली होती. मात्र तब्बल एक वर्षापूर्वीच या मार्गाचे काम करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे जळगाव -उधना, सुरत मार्गावरचा प्रवासात आर्ध्यातासांची बचत होणार आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये याच मार्गावरील धरणगाव ते अमळनेर या २४ कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
१४४ किमीचे काम पूर्ण
जळगाव -उधना या ३०४ रेल्वे मार्गावर आता पर्यंत बारडोली ते चिंचपाड ९० कि.मी.,अमळनेर ते धरणगाव २५ व धरणगांव ते पाळधी १९ कि.मी. अशा जवळपास १४४ कि.मी. मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पाळधी -जळगावचे काम अपूर्ण
पाळधी ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील दूध फेडरेशन समोरील झोपडप˜ी भागातील २०० मीटर रुळाचे काम बाकी आहे. झोपडप˜ीचे अतिक्रमण निघाल्यावर या लाईनचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाळधी ते जळगाव या १० की.मी मार्गवरुन रेल्वे धावणे अद्याप बाकी आहे.