शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पाळधी ते धरणगांव नवीन रेल्वे मार्गावरुन धावली एक्सप्रेस

By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.

जळगाव : पश्चिम रेल्वेच्या उधना -जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरुन पाळधी ते धरणगांव दरम्यानच्या नवीन मार्गाचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९:१० मिनीटांनी अप नवजीवन एक्सप्रेस ही गाडी चालवून करण्यात आले. यामुळे या मार्गाच्या प्रवासात आर्धा तासा वेळेची बचत होणार आहे.
यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता राजेश कुमार, मुख्य अभियंता इलेक्ट्रीक वाय. पी. सिंग, उपमुख्य अभियंता एस.डी. मीना (जळगाव), ठेकेदार एल. के. गोयल यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण होत असल्याने या मार्गावरील वाहतुकीची गती वाढणार आहे. यामुळे चाकरमनी, व्यवसायिक व प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेची बतच होणार आहे. दुहेरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावरुन वाहतूक धिम्या गतीने होत होती. मार्गा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी १० ते १७मार्च दरम्यान रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणारी सायंकाची भुसावळ -सुरत पॅसेंजर बंद ठेवण्यात आली होती.
वर्षभरापूर्वीच झाले काम
उधना-जळगाव मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. पाळधी ते धरणगाव या १९ कि. मी. च्या रेल्वे मार्गाचे कामपूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ ची मुदत देण्यात आली होती. मात्र तब्बल एक वर्षापूर्वीच या मार्गाचे काम करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे जळगाव -उधना, सुरत मार्गावरचा प्रवासात आर्ध्यातासांची बचत होणार आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये याच मार्गावरील धरणगाव ते अमळनेर या २४ कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
१४४ किमीचे काम पूर्ण
जळगाव -उधना या ३०४ रेल्वे मार्गावर आता पर्यंत बारडोली ते चिंचपाड ९० कि.मी.,अमळनेर ते धरणगाव २५ व धरणगांव ते पाळधी १९ कि.मी. अशा जवळपास १४४ कि.मी. मार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पाळधी -जळगावचे काम अपूर्ण
पाळधी ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील दूध फेडरेशन समोरील झोपडप˜ी भागातील २०० मीटर रुळाचे काम बाकी आहे. झोपडप˜ीचे अतिक्रमण निघाल्यावर या लाईनचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे पाळधी ते जळगाव या १० की.मी मार्गवरुन रेल्वे धावणे अद्याप बाकी आहे.