शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

देशातील पाच विमानतळांचे संचालन करण्याचे काम आता अदानी समूहाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:38 IST

अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू, जयपूरचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सहा विमानतळांच्या खासगीकरणासाठी जी निविदा प्रक्रिया राबविली त्यातील पाच विमानतळांच्या संचालनाची बोली अदानी समूहाने जिंकली आहे. त्यामुळे या पाच विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही विमानतळे खासगी कंपनीकडे दिल्याने तिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळू शकतील.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू आणि जयपूर विमानतळांसाठी अदानी यांनी सर्वाधिक मोठी बोली लावली होती. याशिवाय आसाममधील गुवाहाटी विमानतळासाठी गुरुवारी बोली लावण्यात येणार आहे. मासिक प्रति प्रवासी शुल्क या आधारावर विमानतळ प्राधिकरणाने ही निवड केली आहे.प्राधिकरणाºया अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदानी समूहाने लावलेली बोली ही अन्य स्पर्धकांच्या तुलनेत मोठी होती. ही पाच विमानतळे औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे सोपविण्यात येणार आहेत. सहा विमानतळांसाठी १० कंपन्यांकडून ३२ तांत्रिक निविदा आमच्याकडे आल्या होत्या. ही सहा विमानतळे सध्या विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडे आहेत.जागतिक दर्जाच्या सुविधा देणारसरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सहा विमानतळांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी (पीपीपी) एका प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासाठी सात निविदा विमानतळ प्राधिकरणाकडे आल्या होत्या. लखनौ आणि गुवाहाटीसाठी सहा निविदा, तर मंगळुरू आणि तिरुवनंतपूरमसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा पुरविणे हा यामागचा हेतू आहे.