शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आंदोलकांनो, हिंसाचार सोडा!

By admin | Updated: June 19, 2017 01:17 IST

स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/दार्जिलिंग : स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले. प्रश्न सोडवण्यासाठी संवाद साधा, असे ते येथे म्हणाले. हिंसाचार करून तुम्हाला उत्तर शोधता येणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले की,‘‘ तेथे राहणाऱ्या लोकांनी शांत राहावे. सौहार्दाच्या वातावरणात या प्रश्नाशी संबंध असलेल्यांनी संवादाद्वारे आपापसांतील मतभेद व गैरसमज दूर करावेत.’’ भारतासारख्या लोकशाही देशात हिंसाचार करून कधीही प्रश्नाला उत्तर सापडणार नाही. आपापसांतील संवादातून कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी रविवारी तेथील परिस्थितीवर चर्चा केली. दार्जिलिंगमध्ये रविवारी हजारो निदर्शक चौक बाझारमध्ये जमा झाले. त्यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाचा (जीजेएम) पोलिस गोळीबारात ठार झालेल्या कार्यकर्त्याचा मृतदेह आणला होता. तेथे त्यांनी स्वतंत्र गोरखा राज्याच्या मागणीच्या घोषणा दिल्या. जीजेएमचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणावर चकमकी उडाल्यानंतर दार्जिलिंग जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत. निदर्शकांनी दार्जिलिंगमधून पोलिस आणि सुरक्षा दले तत्काळ काढून घेण्याच्या घोषणा दिल्या. सिंगमारी येथे पोलिस गोळीबारात आमचे दोन कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा जीजेएमने केला. पोलिसांनी आम्ही गोळीबार केलाच नाही, असे म्हटले. जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी ममता बॅनर्जी या धादांत खोटे बोलत असल्याचे रविवारी म्हटले. गोरखालँडसाठीचे हे आंदोलन ईशान्येकडील काही बंडखोरांचे गट व विदेशी देशांनी केलेला मोठा कट असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी शनिवारी केला होता. स्वतंत्र राज्यासाठीचे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही गुरुंग यांनी स्पष्ट केले. बॅनर्जी यांचा हा आरोप निराधार असून त्यातून त्या लोकांची दिशाभूल करीत आहेत. हे आंदोलन काही राजकीय संघर्ष नाही तर आमच्या अस्मितेचा लढा आहे. गोरखालँड मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे ते दृकश्राव्य निवेदनात म्हणाले. स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीला पाठिंबा म्हणून शेकडो मुस्लिमांनी रविवारी येथे शांतता मोर्चा काढला. त्यांनी पोलिस अत्याचारांचा निषेधही केला.