शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

आंदोलकांनो, हिंसाचार सोडा!

By admin | Updated: June 19, 2017 01:17 IST

स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/दार्जिलिंग : स्वतंत्र दार्जिलिंग राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी हिंसाचाराच्या मार्गाने न जाण्याचे आवाहन केले. प्रश्न सोडवण्यासाठी संवाद साधा, असे ते येथे म्हणाले. हिंसाचार करून तुम्हाला उत्तर शोधता येणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले की,‘‘ तेथे राहणाऱ्या लोकांनी शांत राहावे. सौहार्दाच्या वातावरणात या प्रश्नाशी संबंध असलेल्यांनी संवादाद्वारे आपापसांतील मतभेद व गैरसमज दूर करावेत.’’ भारतासारख्या लोकशाही देशात हिंसाचार करून कधीही प्रश्नाला उत्तर सापडणार नाही. आपापसांतील संवादातून कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी रविवारी तेथील परिस्थितीवर चर्चा केली. दार्जिलिंगमध्ये रविवारी हजारो निदर्शक चौक बाझारमध्ये जमा झाले. त्यांनी गोरखा जनमुक्ती मोर्चाचा (जीजेएम) पोलिस गोळीबारात ठार झालेल्या कार्यकर्त्याचा मृतदेह आणला होता. तेथे त्यांनी स्वतंत्र गोरखा राज्याच्या मागणीच्या घोषणा दिल्या. जीजेएमचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणावर चकमकी उडाल्यानंतर दार्जिलिंग जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत. निदर्शकांनी दार्जिलिंगमधून पोलिस आणि सुरक्षा दले तत्काळ काढून घेण्याच्या घोषणा दिल्या. सिंगमारी येथे पोलिस गोळीबारात आमचे दोन कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा जीजेएमने केला. पोलिसांनी आम्ही गोळीबार केलाच नाही, असे म्हटले. जीजेएमचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी ममता बॅनर्जी या धादांत खोटे बोलत असल्याचे रविवारी म्हटले. गोरखालँडसाठीचे हे आंदोलन ईशान्येकडील काही बंडखोरांचे गट व विदेशी देशांनी केलेला मोठा कट असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी शनिवारी केला होता. स्वतंत्र राज्यासाठीचे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही गुरुंग यांनी स्पष्ट केले. बॅनर्जी यांचा हा आरोप निराधार असून त्यातून त्या लोकांची दिशाभूल करीत आहेत. हे आंदोलन काही राजकीय संघर्ष नाही तर आमच्या अस्मितेचा लढा आहे. गोरखालँड मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे ते दृकश्राव्य निवेदनात म्हणाले. स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीला पाठिंबा म्हणून शेकडो मुस्लिमांनी रविवारी येथे शांतता मोर्चा काढला. त्यांनी पोलिस अत्याचारांचा निषेधही केला.