शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

केजरीवाल सरकारविरुद्ध नकारात्मक बातम्या छापल्यास होणार कारवाई

By admin | Updated: May 10, 2015 15:48 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अथवा त्यांचे सरकार यांची बदनामी करणारी बातमी छापण्यात वा प्रसारित करण्यात आल्यास मीडियावर कारवाई करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० - ' मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अथवा सरकारची प्रतिमा मलिन करणारी कुठलीही बातमी आल्यास त्याविरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करण्याचे आदेश दिल्ली सरकारने अधिका-यांना दिले असून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशाराही देण्यात आला आहे. थेट प्रसारमाध्यमांनाच लक्ष्य केल्याने केजरीवाल सरकार नवीन वादात सापडले आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयावर सर्व स्तरातून जोरदार टीका होत आहे. यापूर्वी भूसंपादन कायद्याविरोधात आपच्या रॅलीदरम्यान एका शेतक-याने आत्महत्या केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी भाषण ठेवल्याने सरकारवर टीका झाली होती. त्यायनंतर केजरीवाल यांना माफी मागावी लागली होती. तो गदारोळ शांत होतो ना होतो तोच आता नवा वाद निर्माण झाला आहे. 
' वृत्तपत्रातील एखादी बातमी अथवा वृत्तवाहिनीवरील रिपोर्टद्वारे दिल्ली सरकारची बदनामी होत आहे वा प्रतिमा मलीन होत असे जर सरकाराशी संबंधित अधिका-याला वाटले तर त्याने गृह विभागाच्या मुख्य सचिवाकडे यांसंबंधी लगेच तक्रार दाखल करावी. त्यात तथ्य आढळल्यास संबंधित मीडियावर कारवाई करण्यात येईल', असे माहिती व प्रसारण महासंचालनालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी प्रधान सचिवांना पत्र पाठवण्यात येणार आहे. या पत्रात  बातमी वा रिपोर्टची तारीख, त्यात छापण्यात अथवा प्रसारित करण्यात आलेला बदनामीकारक मजकूर, आरोपांची माहिती आणि ज्याच्यावर आरोप करण्यात आला त्या अधिका-याचे म्हणणं या सर्व बाबी नमूद करण्यात येतील. अधिका-याची प्रतिमा मलिन झाल्याचे ज्यातून स्प्ष्ट होत असेल असा सर्व तपशील त्यात असेल, अशी माहिती एका अधिका-याने दिली. 'त्यानंतर प्रधान सचिव याप्रकरणाची चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर भादंवि कलम ४९९/५०० नुसार कारवाई का करू नये अशी नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर हे प्रकरण विधी विभागाकडे पाठवतील आणि कलम १९९(४) नुसार गुन्हा नोंदवण्यासंबंधी मंजुरी मिळवतील' असे तो अधिकारी म्हणाला. 
मात्र केजरीवाल सरकारच्या या आदेशावर जोरदार टीका होत आहे. 'हे परिपत्रक म्हणजे केजरीवाल सरकारच्या चुकीच्या कामांचा परिणाम असून सरकारचा हा निर्णय म्हणजे हुकूमशाही असल्याची टीका भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. तर केजरीवालांचा हा निर्मय म्हणजे माध्यमांवरील सेन्सॉरशीपच असल्याचा आरोप काँग्रेस नेते अजय माकन यांनी केला.