शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

‘स्टार्ट-अप इंडिया’चा कृती आराखडा १६ जानेवारीला सादर करणार

By admin | Updated: December 27, 2015 23:00 IST

देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल

नवी दिल्ली : देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल आणि राज्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये या मोहिमेचा प्रचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी बोलत होते. युवकांसाठी असलेली ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’ ही योजना गरीब आणि युवकांसाठी नव्या संधी घेऊन येईल. हे कसे घडेल? काय घडेल? काय होईल? याबाबतची एक कृती योजना तुमच्यासमोर मांडण्यात येईल. देशभरातील आयआयटी, आयआयएम, सर्व केंद्रीय विद्यालये, एनआयटी आणि जेथे जेथे युवा पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्काद्वारे या कार्यक्रमाशी जोडले जाईल, असे मोदी म्हणाले. स्टार्ट-अपबाबत आपल्याकडे एक समज आहे. जसे डिजिटल जग असो वा आयटी व्यवसाय, हा स्टार्ट-अप त्या लोकांसाठीच आहे, असे मानले जाते; पण तसे नाही. आम्हाला त्यात भारताच्या गरजांनुसार बदल करावयाचा आहे. गरीब माणूस कुठेतरी मोलमजुरी करतो. त्याला शारीरिक श्रम करावे लागतात; परंतु युवकांनी अशी एखादी वस्तू तयार करावी, की ज्यामुळे या गरिबाला मजुरी करताना थोडा दिलासा मिळेल. मी त्यालाच स्टार्ट असे मानतो, असे त्यांनी सांगितले. भारत स्टार्ट-अप राजधानी बनू शकतो काय? आमच्या राज्यांमध्ये युवकांसाठी रोजगाराची संधी म्हणून नवनवे स्टार्ट, बांधकाम क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र आदींमध्ये नवनवे उपक्रम सुरू केले जाऊ शकतात काय, असा सवाल करून मोदी पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीत नावीन्य, नवीन पद्धत, नवा विचार असावा. जग नव्या उपक्रमांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया युवा पिढीसाठी एक फार मोठी संधी घेऊन आलेला आहे. युवकांना मदत करा, असे मी बँकांना सांगणार. हिमतीने पुढे जा, असे युवकांनाही सांगणार. मार्केट मिळेलच. भारतातील प्रत्येक युवकाकडे प्रतिभा आहे. त्यांना फक्त संधी हवी आहे.> अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरण्याचा सल्लाशारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती स्वत:मध्ये फार सक्षम असतात आणि त्यांचे कार्यकर्तृत्व आश्चर्यचकित करणारे असते. हे कार्यकर्तृत्व पाहून त्यांच्यात दिव्य शक्ती असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अशा अपंग व्यक्तींसाठी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग करणे उचित ठरू शकेल, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.