शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

‘स्टार्ट-अप इंडिया’चा कृती आराखडा १६ जानेवारीला सादर करणार

By admin | Updated: December 27, 2015 23:00 IST

देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल

नवी दिल्ली : देशातील युवकांसाठी असलेल्या आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’चा कृती आराखडा येत्या १६ जानेवारीला सादर करण्यात येईल आणि राज्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये या मोहिमेचा प्रचार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी बोलत होते. युवकांसाठी असलेली ‘स्टार्ट-अप इंडिया’ आणि स्टँड-अप इंडिया’ ही योजना गरीब आणि युवकांसाठी नव्या संधी घेऊन येईल. हे कसे घडेल? काय घडेल? काय होईल? याबाबतची एक कृती योजना तुमच्यासमोर मांडण्यात येईल. देशभरातील आयआयटी, आयआयएम, सर्व केंद्रीय विद्यालये, एनआयटी आणि जेथे जेथे युवा पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्काद्वारे या कार्यक्रमाशी जोडले जाईल, असे मोदी म्हणाले. स्टार्ट-अपबाबत आपल्याकडे एक समज आहे. जसे डिजिटल जग असो वा आयटी व्यवसाय, हा स्टार्ट-अप त्या लोकांसाठीच आहे, असे मानले जाते; पण तसे नाही. आम्हाला त्यात भारताच्या गरजांनुसार बदल करावयाचा आहे. गरीब माणूस कुठेतरी मोलमजुरी करतो. त्याला शारीरिक श्रम करावे लागतात; परंतु युवकांनी अशी एखादी वस्तू तयार करावी, की ज्यामुळे या गरिबाला मजुरी करताना थोडा दिलासा मिळेल. मी त्यालाच स्टार्ट असे मानतो, असे त्यांनी सांगितले. भारत स्टार्ट-अप राजधानी बनू शकतो काय? आमच्या राज्यांमध्ये युवकांसाठी रोजगाराची संधी म्हणून नवनवे स्टार्ट, बांधकाम क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र आदींमध्ये नवनवे उपक्रम सुरू केले जाऊ शकतात काय, असा सवाल करून मोदी पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीत नावीन्य, नवीन पद्धत, नवा विचार असावा. जग नव्या उपक्रमांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया युवा पिढीसाठी एक फार मोठी संधी घेऊन आलेला आहे. युवकांना मदत करा, असे मी बँकांना सांगणार. हिमतीने पुढे जा, असे युवकांनाही सांगणार. मार्केट मिळेलच. भारतातील प्रत्येक युवकाकडे प्रतिभा आहे. त्यांना फक्त संधी हवी आहे.> अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरण्याचा सल्लाशारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती स्वत:मध्ये फार सक्षम असतात आणि त्यांचे कार्यकर्तृत्व आश्चर्यचकित करणारे असते. हे कार्यकर्तृत्व पाहून त्यांच्यात दिव्य शक्ती असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अशा अपंग व्यक्तींसाठी ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग करणे उचित ठरू शकेल, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.