शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच

By admin | Updated: October 6, 2015 00:21 IST

महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती नागपूर : महापालिका निवडणुका या सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तेव्हा शासन यात दुसरा निर्णय घेत नाही, तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ...


महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच
राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती

नागपूर :
महापालिका निवडणुका या सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तेव्हा शासन यात दुसरा निर्णय घेत नाही, तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी येथे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्ड नुसार होणार की प्रभाग पद्धतीनुसार होणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली. आजच्या घडीला निवडणूक झाली तर ती वॉर्ड पद्धतीनुसारच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु सोबतच पुढे शासन कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही, अशी पुष्टीही जोडली. राज्यात डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या निवडणुकीमध्ये मतदान करता यावे म्हणून ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होाऱ्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. तसेच नाव, पत्त्यातील बदल, किंवा मृत व्यक्तीचे अथवा दुबार नावे वगळावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

बॉक्स..
इव्हीएम मशीनवर उमेदवारांचा फोटो
काही राज्यांमध्ये इव्हीएम मशीनवर उमेदवारांचे छायाचित्र वापरण्याचा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातही तसा प्रयोग करण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे सहारिया यांनी यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बॉक्स..
मुख्यमंत्र्यांसंदर्भात अद्याप कुठलीही तक्रार नाही
कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे सध्या तरी अशी कुठलीही तक्रार आलेली नाही. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन होणार नाही, यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, तक्रार आल्यास नियमानुसार कारावई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.