शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच

By admin | Updated: October 6, 2015 00:21 IST

महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती नागपूर : महापालिका निवडणुका या सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तेव्हा शासन यात दुसरा निर्णय घेत नाही, तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ...


महापालिका निवडणूक वॉर्डानुसारच
राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती

नागपूर :
महापालिका निवडणुका या सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. तेव्हा शासन यात दुसरा निर्णय घेत नाही, तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी येथे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्ड नुसार होणार की प्रभाग पद्धतीनुसार होणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली. आजच्या घडीला निवडणूक झाली तर ती वॉर्ड पद्धतीनुसारच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु सोबतच पुढे शासन कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही, अशी पुष्टीही जोडली. राज्यात डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या निवडणुकीमध्ये मतदान करता यावे म्हणून ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होाऱ्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. तसेच नाव, पत्त्यातील बदल, किंवा मृत व्यक्तीचे अथवा दुबार नावे वगळावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

बॉक्स..
इव्हीएम मशीनवर उमेदवारांचा फोटो
काही राज्यांमध्ये इव्हीएम मशीनवर उमेदवारांचे छायाचित्र वापरण्याचा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातही तसा प्रयोग करण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे सहारिया यांनी यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बॉक्स..
मुख्यमंत्र्यांसंदर्भात अद्याप कुठलीही तक्रार नाही
कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे सध्या तरी अशी कुठलीही तक्रार आलेली नाही. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन होणार नाही, यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, तक्रार आल्यास नियमानुसार कारावई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.