शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींची निवडणूक होणार १९७१ च्या जनगणनेनुसार

By admin | Updated: May 30, 2017 01:33 IST

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक ४६ वर्षे जुन्या म्हणजे १९७१ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातच जुलैमध्ये होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक ४६ वर्षे जुन्या म्हणजे १९७१ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातच जुलैमध्ये होणार आहे. देशातील अनेक राज्यांना त्यामुळे सध्याच्या लोकसंख्येनुसार मतदानाच्या मूल्यांकनात प्रतिनिधित्व मिळणार नाही, असे राज्यघटनेच्या जाणकारांचे मत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. आमदारांच्या मतांचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते. विधानसभेच्या एकूण जागांनी राज्याच्या लोकसंख्येला भागल्यानंतर जी संख्या येते, त्याचा भागाकार पुन्हा १ हजारांनी केल्यानंतर जी संख्या येते ते त्या आमदाराच्या मताचे मूल्यठरते.खासदारांचे मतमूल्य जरी समान असले, तरी प्रत्येक राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य भिन्न आहे. २0११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.0१ कोटी होती. ती २0१७ साली १२८ कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. मात्र, राष्ट्रपती ४६ वर्षे जुन्या ५४.८१ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात तयार झालेल्या निर्वाचक मंडळाद्वारेच निवडले जातील.राज्यघटनेचे विशेषज्ञ सुभाष कश्यप यांच्या मते राष्ट्रपतीपदाच्या यंदाच्या निवडणुकीसाठी जनगणनेचे आधार वर्ष १९७१ ऐवजी २0११ केले, तर गेल्या ४0 वर्षांत वाढलेली देशाची लोकसंख्या लक्षात घेता आमदारांच्या मताचे मूल्य व एकूण मतदानात त्यांची हिस्सेदारी अनेक पटींनी वाढेल.मात्र, १९७१ च्या जनगणनेनुसार होणाऱ्या निवडणुकीत अनेक राज्यांना विद्यमान लोकसंख्येच्या प्रमाणात मतदानाच्या मूल्यांकनात प्रतिनिधित्व मिळणारनाही.२0२६ पर्यंतच्या सर्व निवडणुका १९७१ च्या जनगणनेनुसारच पहिल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक १९५२ साली १९५१ च्या लोकसंख्येनुसार झाली. पुढे १९६१ साली जनगणनेची आकडेवारी वेळेवर न मिळाल्याने १९६२ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूकही १९५१ च्या लोकसंख्येच्या आधारेच झाली. त्यानंतर १९७१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ८0 च्या दशकापासून राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपन्न होत आली आहे.वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार २00२ साली सत्तेवर असताना एक घटनादुरुस्ती झाली. या दुरुस्तीद्वारे निश्चित करण्यात आले की, २0२६ पर्यंतच्या राष्ट्रपतीपदाच्या सर्व निवडणुका १९७१ च्या जनगणनेनुसारच होतील. दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबवल्याने हा निर्णय घेण्यात आला.