शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

हिराखंड एक्स्प्रेसला अपघात, मृतांचा आकडा 36 वर

By admin | Updated: January 22, 2017 12:58 IST

जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 22 -  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा 36 वर पोहोचला असून, 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
   आंध्रपदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे इंजिनसह सात डबे रुळावरुन घसरुन अपघात झाला.  या अपघातात इंजिनच्या मागचा लगेजचा डबा, तसेच दोन जनरल डबे, दोन स्लिपरचे डबे, एक एसी थ्री टियर डबा  आणि एक सेकंड एसी डबा रुळावरून घसरला. हा अपघात शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास झाला असून यामध्ये आतापर्यंत 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, अपघातग्रस्त डबे रुळावरून हटवण्याचे काम सुरू असून, अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. 
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस (18448) चे इंजिनसह सात डबे रुळावरुन घसरुन हा अपघात झाला. घटनास्थळी डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे, अशी माहिती पूर्व कोस्ट रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जे. पी. मिश्रा यांनी दिली. तसेच, घटनास्थळी विविध ठिकाणांवरून 4 रिलीफ व्हॅन पाठविण्यात आल्याचे आणि प्रवाशी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन तात्काळ सुरु करण्यात आली असल्याचे रेल्वे मंत्रालयानं टि्वट करून सांगितले आहे. दरम्यान, रेल्वेचे सुरक्षा आयुक्त हिराखंड रेल्वे अपघाताची चौकशी करतील. त्यासाठी ते अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी करतील, असे रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले.  
  
 रेल्वेमंत्र्यांकडून मदत जाहीर 
जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दु:ख व्यक्त केले असून, अपघातातील मृतांना दोन लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि  किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली 
जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच  या अपघाताची चौकशी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.