शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

्नरेल्वेला थांबा नसतानाही जीव धोक्यात घालून उतरतात प्रवाशी अमळनेर, धरणगाव स्थानकावरील प्रक ार

By admin | Updated: November 29, 2015 23:57 IST

जळगाव : सुरत - भुसावळ रेल्वेलाईनवरील अमळनेर व धरणगाव स्थानकावर काही जलद गाड्यांना थांबा नसतानाही सुमारे पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून धावत्या गाडीतून स्थानकावर खाली उतरतात. नुकताच डोंबिवली स्थानकावर लोकलमधील गर्दीमुळे एक ा तरुणाला चुकी नसतानाही आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या परिसरातही अशी अप्रीय घटना घडू शकते.

जळगाव : सुरत - भुसावळ रेल्वेलाईनवरील अमळनेर व धरणगाव स्थानकावर काही जलद गाड्यांना थांबा नसतानाही सुमारे पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून धावत्या गाडीतून स्थानकावर खाली उतरतात. नुकताच डोंबिवली स्थानकावर लोकलमधील गर्दीमुळे एक ा तरुणाला चुकी नसतानाही आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या परिसरातही अशी अप्रीय घटना घडू शकते.
अमळनेर व धरणगाव परिसरातील पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी रोजगारासाठी रोज सकाळी ७ वाजेची सुरत-भुसावळ पॅसेंजर तसेच ९.२० वाजेच्या अहमदाबाद - हावडा या गाडीने जळगाव येथे येतात. कर्तव्य आटोपल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगावहून गावाकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. मात्र पाच ते सात वाजेदरम्यान या ठराविक वेळेत गाड्या उपलब्ध नसल्याने मिळतील त्या थांबा नसलेल्या जलद गाड्यांवर बसुन लवकर घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात प्रवास केला जातो.

जीव धोक्यात घालून धावत्या गाड्यांवरून खाली उतरतात प्रवाशी
कर्तव्य पार पाडल्यानंतर प्रवाशी जळगाव स्थानकावर पाच वाजेच्या सुमारास स्थानकावर परतीच्या प्रवासासाठी येतात. जलद गाड्यांवर बसल्यानंतर धरणगाव व अमळनेर स्थानक आल्यावर प्रवाशांची उतरण्यासाठी लगबग सुरू होते. स्थानकावर गाडीची गती सावकाश झाल्याने प्रवाशी गाडीतून खाली उड्या मारुन उतरतात. बर्‍याचदा घसरुन खाली पडण्याच्या घटनांबरोबर अपघातदेखील झाले आहेत.

थांबा नसलेल्या ‘ा गाड्यांवर होतो प्रवास
जळगाव स्थानकावरुन चेन्नई जोधपुर एक्सप्रेस, अहमदाबाद नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, विशाखाप˜णम गांधीधाम एक्सप्रेस व दाणापुर-उधना एक्सप्रेस या गाड्यांना धरणगाव व अमळनेर स्थानकावर थांबा नाही. पण तरीही रोज पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपल्या जीवाची पर्वा न करता स्थानकावर खाली उतरतात.

क ाही गाड्यांना थांबा द्यावा
कामानिमित्त रोज जिल्‘ाच्या ठिकाणी यावे लागत असल्याने बसचा प्रवास परवडत नाही. रेल्वेचा प्रवास सोयीस्कर आहे. मात्र ठराविक वेळेच्या गाड्या थांबत नसल्याने धोक्याचा प्रवास करावा लागतो. वरील गाड्यांना अमळनेर व धरणगाव स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.