शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

अबब! पाकिस्तानात एका व्यक्तीला 38 मुलं

By admin | Updated: June 10, 2017 18:05 IST

पाकिस्तानमध्ये एका व्यक्तिला तब्बल ३८ मुलं आहेत. तर आणखी दोन जणांना प्रत्येकी ३६ मुलं असल्याचं पाकिस्तानच्या जनगणनेतून समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत

बन्नू, दि. 10- एखाद्या व्यक्तिला साधारण किती मुलं असू शकतात ? खरंतर याचा अंदाज आपण कदाचित पटकन लावू नाही शकत. पण पाकिस्तानमधील एक गोष्ट ऐकुन तुम्हाला धक्का बसेल. पाकिस्तानमध्ये एका व्यक्तिला तब्बल ३८ मुलं आहेत. तर आणखी दोन जणांना प्रत्येकी ३६ मुलं असल्याचं पाकिस्तानच्या जनगणनेतून समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे ही मुलं अल्लाची देण आहे, असं तो व्यक्ती अभिमानाने सांगतो आहे. 
 
बलूचिस्तानच्या क्वेटामध्ये राहणाऱे जान मोहम्मद यांना ३८ मुले आहेत. २०१६ मध्ये त्यांनी चौथं लग्न करण्याविषयी सांगितलं होतं. कारण त्यांना १०० मुलांना जन्म द्यायचा होता. पण कोणतीच महिला त्यांच्याशी लग्न करायला तयार नाही. पण तरीही ते चौथ्या लग्नासाठी तयार झाले. मुस्लिमांची जेवढी जास्त लोकसंख्या असेल तेवढं चांगलं. त्यामुळे पाकिस्तानला शत्रू घाबरतील. आम्ही जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे, असं जान मोहम्मद यांचं मत आहे.
 
पाकिस्तानात तब्बल १९ वर्षानंतर जनगणना करण्यात आली आहे. जुलैमध्ये त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. पण या जनगणनेतून अनेक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. १९९८ मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या १३.५ कोटी होती. आता ही लोकसंख्या २० कोटी झाली आहे. जागतिक बँक आणि सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तान दक्षिण आशियातील सर्वाधिक जन्मदर असणारा देश आहे. पाकिस्तानात सरासरीनुसार प्रत्येक महिलेला तीन मुलं आहेत.
 
गुलजार खान  या व्यक्तीला ३६ मुलं आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अल्लाहने संपूर्ण जगात मानवाची निर्मिती केली आहे. त्यामुळे मुलं जन्माला घालणारी नैसर्गिक प्रक्रिया का थांबवावी ? असं मत ते व्यक्त करतात.  कबाली परिसरातील बन्नू येथे राहणारे गुलजार  यांची तिसरी बायको गर्भवती आहे. आम्हाला सक्षम व्हायचं आहे. क्रिकेट खेळताना माझ्या मुलांना आता मित्रांची गरज नाही, असं गुलजार यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर  गुलजारचा भाऊ मस्तान खान वजीर यांनाही तीन पत्नी आहेत. वजीर यांना २२ मुले आहेत. त्यांच्या नातवंडांची संख्या एवढी आहे की त्यांना मोजताही येत नाही, असं मस्तान खान यांचं म्हणणं आहे. अन्न आणि वस्त्र देण्याचं अल्लाने वचन दिलं आहे. पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास कमी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
एखाद्या व्यक्तीला इतकी मुलं असणं हे सोई-सुविधा पुरविण्याच्या तसंच आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. याचा विकासावर वाईट परिणाम होइल, असं संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या परिषदेच्या कंट्री निर्देशक जेबा ए. साथर यांनी सांगितलं आहे.