शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अबब! निवडणुकांवर ३, ४२६ कोटींचा खर्च

By admin | Updated: May 15, 2014 04:21 IST

देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी निवडणूका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.

नवी दिल्ली : देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी निवडणूका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. यंदा मात्र ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केंद्र शासनाला खर्च करावा लागला आहे तो थोडाथोडका नव्हे तर चक्क ३ हजार ४२६ कोटी रुपयांचा. २००९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणूकांच्या खर्चात चक्क १३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील आतापर्यंतच्या निवडणूकांमधील खर्चाचा ‘रेकॉर्ड’ यंदा मोडल्या गेला आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये १ हजार ४८३ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. नऊ टप्प्यांमध्ये झालेल्या यंदाच्या निवडणूकांत केंद्र शासन, राजकीय पक्ष व उमेदवारांनी मिळून एकत्रितपणे जवळपास ३० हजार कोटींचा खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी यंदा निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मतदार जागृती मोहीम, मतपत्रिकांचे वाटप आणि प्रथमच वापरण्यात आलेली ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या सहाय्याने ‘पेपर आॅडीट’ करण्याची प्रणाली यामुळे यंदाच्या शासकीय खर्चात वाढ झाली आहे. यंदा अनेक नवीन राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार निवडणूकांच्या रिंगणात होते. यंदा उमेदवारांची प्रचारखर्च मर्यादा ४० लाखांहून ७० लाख इतकी करण्यात आली होती. जास्त उमेदवार असल्याने सहाजिकच खर्च वाढणे अपेक्षितच होते असे मत निवडणूक आयोगातील सूत्रांनी व्यक्त केले आहे. १९५२ साली झालेल्या निवडणूकांमध्ये प्रति मतदार ६० पैशांचा खर्च आला होता. ५७ वर्षांनंतर २००९ साली हाच आकडा १२ रुपये प्रति मतदार इतका पोहोचला. निवडणूकांसाठी होणारा सर्व शासकीय खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येतो. परंतु कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे ही स्थानिक राज्य शासनाची जबाबदारी असते.