शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

अबब! निवडणुकांवर ३, ४२६ कोटींचा खर्च

By admin | Updated: May 15, 2014 04:21 IST

देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी निवडणूका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.

नवी दिल्ली : देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी निवडणूका निष्पक्ष व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. यंदा मात्र ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केंद्र शासनाला खर्च करावा लागला आहे तो थोडाथोडका नव्हे तर चक्क ३ हजार ४२६ कोटी रुपयांचा. २००९ च्या तुलनेत यंदाच्या निवडणूकांच्या खर्चात चक्क १३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील आतापर्यंतच्या निवडणूकांमधील खर्चाचा ‘रेकॉर्ड’ यंदा मोडल्या गेला आहे. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये १ हजार ४८३ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. नऊ टप्प्यांमध्ये झालेल्या यंदाच्या निवडणूकांत केंद्र शासन, राजकीय पक्ष व उमेदवारांनी मिळून एकत्रितपणे जवळपास ३० हजार कोटींचा खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी यंदा निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मतदार जागृती मोहीम, मतपत्रिकांचे वाटप आणि प्रथमच वापरण्यात आलेली ‘व्हीव्हीपॅट’ मशीनच्या सहाय्याने ‘पेपर आॅडीट’ करण्याची प्रणाली यामुळे यंदाच्या शासकीय खर्चात वाढ झाली आहे. यंदा अनेक नवीन राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार निवडणूकांच्या रिंगणात होते. यंदा उमेदवारांची प्रचारखर्च मर्यादा ४० लाखांहून ७० लाख इतकी करण्यात आली होती. जास्त उमेदवार असल्याने सहाजिकच खर्च वाढणे अपेक्षितच होते असे मत निवडणूक आयोगातील सूत्रांनी व्यक्त केले आहे. १९५२ साली झालेल्या निवडणूकांमध्ये प्रति मतदार ६० पैशांचा खर्च आला होता. ५७ वर्षांनंतर २००९ साली हाच आकडा १२ रुपये प्रति मतदार इतका पोहोचला. निवडणूकांसाठी होणारा सर्व शासकीय खर्च केंद्र सरकारकडून करण्यात येतो. परंतु कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे ही स्थानिक राज्य शासनाची जबाबदारी असते.