शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी थकले

By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST

आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे.

नवी दिल्ली : आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे. तथापि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकबाकीचा आकडा १२,३०० कोटींवर गेला आहे.भारतीय साखर कारखाना संघाच्या (इस्मा) माहितीनुसार मागच्या वर्षात भारतात याच अवधीत ४५.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या विपणन वर्षात (२०१४-१५ आॅक्टोबर ते सप्टेंबर) साखरेचे उत्पादन २.६ कोटी टन होईल, असा अंदाज इस्माने मागच्या महिन्यात व्यक्त केला होता. मागच्या वर्षात (२०१३-१४) साखरेचे उत्पादन २.४३ कोटी टन झाले होते. इस्माने जारी केलेल्या निवेदनानुसार ५१८ साखर कारखान्यांत १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत १६७.०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात या अवधीपर्यंत ४२.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले .ब्राझीलनंतर भारत हा जगातील सर्वांत दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.महाराष्ट्रात मागच्या वर्षात ४९.८ लाख साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात ६५ लाख टन उत्पादन झाले असून कर्नाटकात २८.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या भावानुसार १२,३०० कोटी रुपये थकले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास थकीत बिलाचा आकडा १३,००० कोटींवर जाईल. दरवर्षी मार्चअखेर थकीत बिलाचा आकडा वाढलेला असतो.