शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी थकले

By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST

आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे.

नवी दिल्ली : आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे. तथापि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकबाकीचा आकडा १२,३०० कोटींवर गेला आहे.भारतीय साखर कारखाना संघाच्या (इस्मा) माहितीनुसार मागच्या वर्षात भारतात याच अवधीत ४५.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या विपणन वर्षात (२०१४-१५ आॅक्टोबर ते सप्टेंबर) साखरेचे उत्पादन २.६ कोटी टन होईल, असा अंदाज इस्माने मागच्या महिन्यात व्यक्त केला होता. मागच्या वर्षात (२०१३-१४) साखरेचे उत्पादन २.४३ कोटी टन झाले होते. इस्माने जारी केलेल्या निवेदनानुसार ५१८ साखर कारखान्यांत १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत १६७.०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात या अवधीपर्यंत ४२.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले .ब्राझीलनंतर भारत हा जगातील सर्वांत दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.महाराष्ट्रात मागच्या वर्षात ४९.८ लाख साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात ६५ लाख टन उत्पादन झाले असून कर्नाटकात २८.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या भावानुसार १२,३०० कोटी रुपये थकले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास थकीत बिलाचा आकडा १३,००० कोटींवर जाईल. दरवर्षी मार्चअखेर थकीत बिलाचा आकडा वाढलेला असतो.