शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

अभिजित कोळपे बातमी : घोड्यांच्या रेस शिवसेना बंद करणार

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

शिवाजीराव आढळराव-पाटील : पर्यावरणमंत्र्यांना पाठवणार पत्र

शिवाजीराव आढळराव-पाटील : पर्यावरणमंत्र्यांना पाठवणार पत्र
लेण्याद्री : ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीला बंदी, तर शहरात घोड्यांच्या शर्यतींना परवानगी, अशा पद्धतीचा कारभार राज्यात सुरू आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सर्व घोड्यांच्या रेस शिवसेना बंद करणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात लक्ष घातले आहे, अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी येथे दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि देशभरातील बैलगाडा शर्यती सध्या बंद आहेत. बैल जंगली प्राणी असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सन २०११ मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे अनेक दिवस प्रलंबित आहे. याप्रकरणी मागील पाच महिन्यांपासून पर्यावरणमंत्री ते थेट लोकसभा सभागृह असा आवाज उठवूनही भाजपा सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. एकीकडे केंद्र सरकार सामान्य शेतकर्‍यांच्या बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी बैलांना जंगली यादीतून काढून टाकण्यासाठी कुठलाही निर्णय घेत नसताना राज्यात श्रीमंत वर्गाचा शोक असलेला व कोट्यावधी रुपयांची स˜ेबाजी होणार्‍या घोड्यांच्या शर्यती मात्र बेधडक सुरू आहेत. बैलगाडा शर्यतींवर जिल्‘ातील यात्रांची अर्थव्यवस्था अवलंबून असताना त्याबाबत निर्णय होत नाही. त्यामुळे घोड्यांच्या रेस बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे खासदार आढळराव यांनी सांगितले.
याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोड्यांच्या रेस बंद करण्यासाठी तातडीची कार्यवाही करा, अन्यथा घोड्यांच्या रेस बंद करण्याच्या इशार्‍याचे पत्र पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठविले जाणार आहे. बैलगाडा शर्यत बंद झाल्याने बैलांची रवानगी कत्तलखान्यात होण्याचा धोका आहे. याबाबत राज्यातील कत्तलखान्यावरदेखील लक्ष ठेवणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले. घोड्याच्या शर्यतीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात करही वसूल केला जातो. तसेच, घोड्याचे अतोनात हालदेखील केले जातात. त्यामुळे अशा घोड्याच्या बेकायदेशीर स्पर्धा शिवसेना यापुढे करू न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आढळराव-पाटील यांनी दिली.
चौकट
पुनर्याचिकेचा निकाल लवकरच
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर आपण लगेचच पुनर्याचिका दाखल केली. याचा निर्णय लवकरच बैलगाडा शौकिनांसारखा लागेल, असा आशावाद खासदार आढळराव यांनी व्यक्त केला.