शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत
राजेगाव : राज्य मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मुभा सहा महिने केली आहे. निवडणुकीमध्ये लढणार्‍या राखीव प्रवर्गातील हजारो उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळात नुकत्याच घेण्यात आलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील ग्रामस्थांमधून स्वागत करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यामध्येही सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. तालुक्यातील राजेगाव, नायगाव, स्वामी चिंचोली, वरवंड, पाटस, पारगाव, गार या गावात अनुसूचित जमाती या प्रवर्गातील ठाकर, पारधी, भिल्ल, महादेव कोळी या जातीचे लोक राहत असल्यामुळे त्या-त्या गावात संबंधित प्रवर्गाचे प्रतिनिधी निवडून दिले जातात. या लोकांना जातीचे दाखले मिळतात; परंतु जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी फार अडचणीला तोंड द्यावे लागते. ज्या कोणाकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे, त्यांतील बहुतांशी लोक सरकारी नोकरीला असल्याने त्यांना निवडणुकीसाठी उभे राहता येत नाही. त्यामुळे एक तर या प्रवर्गातील जागा रिक्तच राहतात अथवा निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्राअभावी सदस्यत्व रद्द होते. निवडणूक झाल्यानंतर काही गावांत स्थानिक गटतट व बेरजेचे राजकारण यांमुळे कोणीही हरकत न घेतल्याने जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी पाच वर्षे सदस्यत्व कायम राहिल्याची उदाहरणेही काही गावांत पाहायला मिळतात.

(चौकट)
प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक बिलंब
पि›म महाराष्ट्र ठाकर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लोंढे यांच्या मागणीनुसार ६ महिन्याची मुदत फार कमी आहे. कारण, पुणे येथील आदिवासी संशोधन समिती सहा महिन्यांत अनेक तांत्रिक बाबी उपस्थित करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक बिलंब लावते. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होऊन त्याच्यावर अन्याय होत असल्याचे मत लोंढे यांनी व्यक्त केले.

विशेष मोहीम सहा महिने अगोदरच राबवावी
राजेगावचे माजी उपसरपंच प्रवीण लोंढे म्हणाले, की निवडणूक असलेल्या गावामध्ये जातीचे दाखले देण्याची विशेष मोहीम सहा महिने अगोदरच राबविली पाहिजे. त्यामुळे ऐन निवडणुकीत अडचण येणार नाही व जात वैधता प्रमाणपत्राअभावी त्या प्रभागातील पद रिक्त राहणार नाही.