शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

अभिजित कोळपे बातमी : जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत
राजेगाव : राज्य मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देण्याची मुभा सहा महिने केली आहे. निवडणुकीमध्ये लढणार्‍या राखीव प्रवर्गातील हजारो उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी उमेदवारांना अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळात नुकत्याच घेण्यात आलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील ग्रामस्थांमधून स्वागत करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यामध्येही सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे. तालुक्यातील राजेगाव, नायगाव, स्वामी चिंचोली, वरवंड, पाटस, पारगाव, गार या गावात अनुसूचित जमाती या प्रवर्गातील ठाकर, पारधी, भिल्ल, महादेव कोळी या जातीचे लोक राहत असल्यामुळे त्या-त्या गावात संबंधित प्रवर्गाचे प्रतिनिधी निवडून दिले जातात. या लोकांना जातीचे दाखले मिळतात; परंतु जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी फार अडचणीला तोंड द्यावे लागते. ज्या कोणाकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे, त्यांतील बहुतांशी लोक सरकारी नोकरीला असल्याने त्यांना निवडणुकीसाठी उभे राहता येत नाही. त्यामुळे एक तर या प्रवर्गातील जागा रिक्तच राहतात अथवा निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्राअभावी सदस्यत्व रद्द होते. निवडणूक झाल्यानंतर काही गावांत स्थानिक गटतट व बेरजेचे राजकारण यांमुळे कोणीही हरकत न घेतल्याने जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी पाच वर्षे सदस्यत्व कायम राहिल्याची उदाहरणेही काही गावांत पाहायला मिळतात.

(चौकट)
प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक बिलंब
पि›म महाराष्ट्र ठाकर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लोंढे यांच्या मागणीनुसार ६ महिन्याची मुदत फार कमी आहे. कारण, पुणे येथील आदिवासी संशोधन समिती सहा महिन्यांत अनेक तांत्रिक बाबी उपस्थित करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक बिलंब लावते. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होऊन त्याच्यावर अन्याय होत असल्याचे मत लोंढे यांनी व्यक्त केले.

विशेष मोहीम सहा महिने अगोदरच राबवावी
राजेगावचे माजी उपसरपंच प्रवीण लोंढे म्हणाले, की निवडणूक असलेल्या गावामध्ये जातीचे दाखले देण्याची विशेष मोहीम सहा महिने अगोदरच राबविली पाहिजे. त्यामुळे ऐन निवडणुकीत अडचण येणार नाही व जात वैधता प्रमाणपत्राअभावी त्या प्रभागातील पद रिक्त राहणार नाही.