शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 18:56 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे. त्यांनी देशातील लोकांना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. केजरीवाल म्हणाले की चीनच्या आयातीचा मुद्दा देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला वेदना देणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्याकडे डोळे वटारुन पाहात आहे. आता छोटे छोटे वार करुन काही उपयोग नाही असं सांगत केजरीवाल यांनी यावेळी चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा मास्टर प्लान सांगितला. 

"भारतीय जवान चीनच्या आगळीकीला जशास तसं उत्तर देत आहेत. काही जवानांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मग हेही ऐकू येतं की चीन भारतीय सीमेत काही किलोमीटर आत शिरला आहे. भारत सरकार म्हणतं सारंकाही ठिक आहे. मग मीडियात बातम्या येतात की सीमेवर सारंकाही आलबेल नाही. एका बाजूला चीन मोठ्या हिमतीनं चीनी सैनिकांचा मुकाबला करत आहे", असं केजरीवाल म्हणाले. 

भाजपावर केला हल्लाबोल"केंद्र सरकार आणि भाजपावाले चीनला उत्तर देण्याऐवजी चीनला डोळ्यात डोळे घालून उत्तर देण्याऐवजी बक्षिसांचा वर्षाव होत आहे. भारतानं चीनकडून ६५ बिलियन डॉलरचं सामान खरेदी केलं आहे. केंद्राचा असा कोणता नाईलाज झाला आहे की चीनला इतका मोठा व्यवसाय दिला जात आहे. चीनहून चप्पल, खेळणी आणि कपडे आयात केले जातात. हे सामान तर भारतातही तयार केलं जाऊ शकतं", असं केजरीवाल म्हणाले. 

९० टक्के वस्तूंचं भारतातच उत्पादन करता येईलकेजरीवाल म्हणाले, भारतीय जनता पक्षाला माझं आवाहन आहे की असं स्वत: गहाण टाकण्याचं काम करू नका. चीनसमोर झुकू नका. ज्या दिवशी आपण चीनच्या वस्तू बॉयकॉट करणं सुरू करू तेव्हाच चीनला त्यांची औकात लक्षात येईल. चीनहून आयात केल्या जाणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक वस्तू भारतातही उत्पादित केल्या जाऊ शकतात. भारताची परिस्थिती सध्या इतकी वाईट करुन ठेवलीय की मोठ-मोठे उद्योगपती देश सोडून जात आहेत"

गेल्या पाच ते सात वर्षात १२.३० लाख लोक भारत सोडून गेले आहेत. इथं कुणालाच काम करू दिलं जात नाही. मोठ-मोठे व्यापारी देश सोडून जात आहेत. खोट्या केसेस दाखल करुन सर्वांना ठेच पोहोचवली जात आहे. चोरांना आपल्या पक्षात सामील करुन घेतलं जातं आणि जे इमानदारीनं काम करु इच्छित आहेत ते मागे पडत आहेत, असंही केजरीवाल म्हणाले. 

चीनचा स्वस्त माल नको"चीनला आपल्या सैनिकांच्या जीवाची अजिबात किंमत नाही. चीन स्वस्त माल देतो असं सांगितलं जातं. पण आपल्याला स्वस्त माल नको. आम्ही भारताचा माल खरेदी करू मग तो कितीही बनू देत", असं केजरीवाल म्हणाले. त्यांनी यावेळी मेक इन इंडियावर जोर दिला आणि भारतातील जनतेला कट्टर देशभक्त देखील म्हटलं. "भारतातील लोक कट्टर देशभक्त आहेत. आम्हाला चीनचा स्वस्त माल नको. आम्ही भारतात तयार झालेलाच माल खेरदी करू मग तो चीनच्या तुलनेत दुप्पट किमतीला का असेना. पण चीनहून माल आयात करणं थांबवा. देशातील जनतेलाही मला आवाहन करायचं आहे की चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका", असंही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल