शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

आमिरने भारताची प्रतिमा मलीन केली

By admin | Updated: January 19, 2016 13:23 IST

असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत 'अतुल्य भारत' कॅम्पेनमागचा प्रमुख चेहरा असलेल्या अमिताब कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १९ - देशातील असहिष्णूतेबद्दल वक्तव्य केल्यामुळे अभिनेता आमिर खानला 'अतुल्य भारत' मोहमेच्या ब्रँड अँम्बेसेडरपदावरून काढण्यात आल्याच्या निर्णयावरून बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. मात्र ' असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत या मोहिमेमागील प्रमुख चेहरा असलेले औद्योगिक धोरण आणि प्रसार विभागाचे  (DIPP - इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन डिपार्टमेंट) सचिव अमिताभ कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले आहे. सोमवारी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
' ब्रँड अँम्बेसेडर हा एखाद्या ब्रँडचे प्रमोशन करत असतो. भारत हा अतुल्य आहे असा प्रसार जर या मोहिमेच्या ब्रँड अँम्बेसडरने केला तरच परदेशातील पर्यटकांचा भारताकडे ओढा वाढेल. पण जर देशाचा ब्रँड अँम्बेसेडरच भारत असहिष्णू असल्याचे वक्तव्य करत असेल तर तो त्याचे नेमून दिलेले काम व्यवस्थित करत नाही, हे स्पष्ट होते ' असे कांत यांनी सांगितले. ' आमिरने या देशाची ओळख, प्रतिमा मलीन केली आहे. त्याचे वक्तव्य ऐकल्यानंतर इतर देशातील नागरिक भारतात येणार नाही. ब्रँड अँम्बेसेडरचे काम हे त्या ब्रँडचा प्रसार करणे असते, त्याची ओळख नष्ट करणे नव्हे' असे नमूद करत कांत यांना आमिरच्या हकालपट्टीचे समर्थनच केले. 
पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे चालवण्यात येणा-या 'अतुल्य भारत' या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून त्याला काढून टाकण्यात आले. त्यावर ' सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार' असे आमिरने म्हटले होते.