शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आमिरने भारताची प्रतिमा मलीन केली

By admin | Updated: January 19, 2016 13:23 IST

असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत 'अतुल्य भारत' कॅम्पेनमागचा प्रमुख चेहरा असलेल्या अमिताब कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १९ - देशातील असहिष्णूतेबद्दल वक्तव्य केल्यामुळे अभिनेता आमिर खानला 'अतुल्य भारत' मोहमेच्या ब्रँड अँम्बेसेडरपदावरून काढण्यात आल्याच्या निर्णयावरून बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. मात्र ' असहिष्णूतेबाबत वक्तव्य करून आमिरने देशाची प्रतिमा मलिन केली' असे सांगत या मोहिमेमागील प्रमुख चेहरा असलेले औद्योगिक धोरण आणि प्रसार विभागाचे  (DIPP - इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन डिपार्टमेंट) सचिव अमिताभ कांत यांनी आमिरच्या हकालपट्टीचे समर्थन केले आहे. सोमवारी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
' ब्रँड अँम्बेसेडर हा एखाद्या ब्रँडचे प्रमोशन करत असतो. भारत हा अतुल्य आहे असा प्रसार जर या मोहिमेच्या ब्रँड अँम्बेसडरने केला तरच परदेशातील पर्यटकांचा भारताकडे ओढा वाढेल. पण जर देशाचा ब्रँड अँम्बेसेडरच भारत असहिष्णू असल्याचे वक्तव्य करत असेल तर तो त्याचे नेमून दिलेले काम व्यवस्थित करत नाही, हे स्पष्ट होते ' असे कांत यांनी सांगितले. ' आमिरने या देशाची ओळख, प्रतिमा मलीन केली आहे. त्याचे वक्तव्य ऐकल्यानंतर इतर देशातील नागरिक भारतात येणार नाही. ब्रँड अँम्बेसेडरचे काम हे त्या ब्रँडचा प्रसार करणे असते, त्याची ओळख नष्ट करणे नव्हे' असे नमूद करत कांत यांना आमिरच्या हकालपट्टीचे समर्थनच केले. 
पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, अनेकांनी त्याला देश सोडून जाण्याचा सल्लाही दिला होता. त्याचे हे वक्तव्य त्याला भलतेच महागात पडले. देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे चालवण्यात येणा-या 'अतुल्य भारत' या कॅम्पेनच्या ब्रँड अँम्बेसडर पदावरून त्याला काढून टाकण्यात आले. त्यावर ' सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार' असे आमिरने म्हटले होते.