शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

‘अतुल्य भारत’मधून आमीर खान बाहेर

By admin | Updated: January 7, 2016 10:25 IST

‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला

नवी दिल्ली : ‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला असला तरी अलीकडेच आमीरने केलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.‘मॅककॅन वर्ल्डवाईड’ या संस्थेने आमीरशी ‘अतिथी देवो भव’ या जाहिरातीसाठी केलेला करार संपला आहे, त्यामुळेच आपसूकच संबंधित व्यवस्था संपुष्टात आली आहे. मंत्रालयाने त्याच्याशी करार केला नव्हता, असे पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी नमूद केले. आमीर अद्यापही पर्यटन मंत्रालयाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर आहे काय? यावर त्यांनी निश्चितच नाही, असे उत्तर दिले. अतुल्य भारत मोहिमेचा एक भाग म्हणून ‘अतिथी देवो भव’ची जाहिरात केली जात होती. ही संपुआ सरकारच्या काळातील योजना होती. या मुद्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीआयअंतर्गत प्रश्न विचारण्यात आला असता मंत्रालयाने संदिग्ध निवेदन दिले होते.> आमीर खानबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी पर्यटन मंत्रालयात कोणताही बदल झालेला नाही. समाजजागृतीसाठी मोहिमेची जबाबदारी मॅककॅन वर्ल्डवाईडकडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने आमीरशी केलेला करार संपला आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले.