शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

‘अतुल्य भारत’मधून आमीर खान बाहेर

By admin | Updated: January 7, 2016 10:25 IST

‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला

नवी दिल्ली : ‘अतुल्य भारत’ मोहिमेचा चेहरा बनलेला अभिनेता आमीर खान यापुढे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर म्हणून दिसणार नाही, त्याचा करार संपला असल्याचा खुलासा सरकारने केला असला तरी अलीकडेच आमीरने केलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जावे का? अशी विचारणा केल्याचे सांगत आमीरने देशात असहिष्णुता वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. देशातील असुरक्षित वातावरणात मुलांच्या सुरक्षेबाबत भीती वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.‘मॅककॅन वर्ल्डवाईड’ या संस्थेने आमीरशी ‘अतिथी देवो भव’ या जाहिरातीसाठी केलेला करार संपला आहे, त्यामुळेच आपसूकच संबंधित व्यवस्था संपुष्टात आली आहे. मंत्रालयाने त्याच्याशी करार केला नव्हता, असे पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी नमूद केले. आमीर अद्यापही पर्यटन मंत्रालयाचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर आहे काय? यावर त्यांनी निश्चितच नाही, असे उत्तर दिले. अतुल्य भारत मोहिमेचा एक भाग म्हणून ‘अतिथी देवो भव’ची जाहिरात केली जात होती. ही संपुआ सरकारच्या काळातील योजना होती. या मुद्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीआयअंतर्गत प्रश्न विचारण्यात आला असता मंत्रालयाने संदिग्ध निवेदन दिले होते.> आमीर खानबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी पर्यटन मंत्रालयात कोणताही बदल झालेला नाही. समाजजागृतीसाठी मोहिमेची जबाबदारी मॅककॅन वर्ल्डवाईडकडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने आमीरशी केलेला करार संपला आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केले.