शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

महाराष्ट्रातही ‘आप’ला फुटीची बाधा?

By admin | Updated: March 30, 2015 23:16 IST

पक्षातील अंतर्गत कलह, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नेते, यातून समोर येत असलेले एकापाठोपाठ एक असे स्टिंग

नवी दिल्ली : पक्षातील अंतर्गत कलह, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नेते, यातून समोर येत असलेले एकापाठोपाठ एक असे स्टिंग आणि आरोप-प्रत्यारोप, यामुळे महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीचे (आप) अनेक नेते अतिशय निराश आहेत. पक्षाला ‘रामराम’ ठोकण्याचा विचार या नेत्यांनी चालवला आहे.अंजली दमानिया यांनी पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आहेत. काल रविवारी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता महाराष्ट्रातील ‘आप’चे नेते मारुती भापकर यांनी पक्षातील या यादवीला कंटाळून राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जे झाले ते लोकशाहीच्या हत्येपेक्षा कमी नव्हते. मी दु:खी आहे व पक्ष सोडण्यावर गंभीरपणे विचार करत आहे. उद्या होऊ घातलेल्या राज्य समितीच्या बैठकीत याबाबत मी निर्णय घेईन, असे भापकर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात अण्णा आंदोलनाचे नेतृत्व केलेल्या मयंक गांधी यांनी केजरीवालांच्या ‘हुकूमशाही’विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला आहे. तूर्तास त्यांनी या मुद्यावर बोलायचे टाळले. मात्र त्यांच्या एका निकटच्या सूत्रांच्या मते, विद्यमान स्थितीत ‘आप’ मध्ये काम करणे मयंक यांच्यासाठी कठीण झाले आहे. अन्य एका नेत्याच्या मते, अंजली दमानिया यांनी कधीच पक्ष सोडला आहे. विजय पांढरे, सुभाष वारे आणि राज्यातील अन्य काही बडे नेते पक्षातील कुरबुरींमुळे निराश आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)