शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
3
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
4
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
7
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
8
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
9
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
10
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
11
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
12
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
13
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
14
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
15
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
16
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
17
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
18
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
19
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
20
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
Daily Top 2Weekly Top 5

90 टक्के भारतीय संगणक वापरकर्त्यांना पाठवता येत नाही ई-मेल

By admin | Updated: April 26, 2016 14:20 IST

देशभरातील संगणक वापरकर्त्यांपैकी फक्त 14.2 टक्के लोकांना टेक्स्ट फाईल बनवता येते, तर 12 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांना मेल पाठवण्याचं ज्ञान आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 26 - एकीकडे केंद्र सरकार डिजीटल इंडिया कॅम्पेनवर लक्ष केंद्रीत करत असताना भारतातील संगणक साक्षरतेचं प्रमाण खूपच कमी असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संगणक वापरकर्त्यांच्या साक्षरतेसंबंधी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. देशभरातील संगणक वापरकर्त्यांपैकी फक्त 14.2 टक्के लोकांना टेक्स्ट फाईल बनवता येते. तर फक्त 12.4 टक्के लोकांना मेल पाठवण्याचं ज्ञान आहे. इतर लोकांना मेल कसा पाठवायचा ? किंवा तो कसा तयार करायचा ? याची काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे.
 
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने हा अहवाल प्रसिद्द केला आहे. अहवालानुसार शहरांशी तुलना करता ग्रामीण भागातील संगणक साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागात फक्त 7.8 टक्के लोक संगणकाचा वापर करतात. शहरी भागातील परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा चांगली असून 28 टक्के लोकांना संगणकावरील वर्ड फाईलचं ज्ञान आहे. 
अहवालानुसार फक्त 13.5 टक्के संगणक वापरकर्त्यांना इंटरनेटवर सर्च करता येतं. ग्रामीण भागात हे प्रमाण 7.3 टक्के आहे. देशातील फक्त 12.4 टक्के लोकांना ईमेल पाठवण्याचं ज्ञान आहे. ग्रामीण भागात तर फक्त 6 टक्के लोकांना मेल कसा पाठवायचा हे माहित आहे. अहवालात तरुणांसंबंधी देण्यात आलेली माहिती धक्कादायक आहे. 14 ते 29 वयोगटातील फक्त 27.8 टक्के तरुणांना संगणक वापरता येतो. याचा अर्थ प्रत्येक तिसरा तरुण संगणक असाक्षर आहे. याचप्रमाणे 30 ते 45 वयोगटातील 90 टक्के लोक संगणक वापराबद्द्ल अनभिज्ञ आहेत.