शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 11:46 IST

दहा जखमी; लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात

इम्फाळ : मणिपूरमधील खामेनलोक भागातील एका गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार व दहा लोक जखमी झाले आहेत. मैतेई जमातीची बहुसंख्या असलेला इम्फाळ पूर्व जिल्हा व कांगपोकी या आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कुकी जमातीच्या गावाला मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी वेढा दिला. त्यावेळी दहशतवादी व गावकऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. मात्र, या घटनेनंतर इम्फाळ पूर्व व इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी शिथिल करण्याचा कालावधी कमी केला आहे. मणिपूरमधील १६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये मैतेई व कुकी जमातींमध्ये गेल्या महिनाभरातील हिंसाचारात १००हून अधिक लोकांचा मृत्यू व ३१०पेक्षा अधिक जण जखमी झाले. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मैतेई जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी ३ मे रोजी मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर या राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला.

या राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर काही काळ मणिपूरमध्ये शांतता होती; पण आता पुन्हा हिंसक घटना घडल्या. (वृत्तसंस्था)

‘डबल इंजिन’चे सरकार अपयशी का ठरले?

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी का ठरत आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. त्या राज्यातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी एक बैठकही घेतली नाही, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारterroristदहशतवादी