शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ९ ठार, पुन्हा हिंसाचार उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 11:46 IST

दहा जखमी; लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात

इम्फाळ : मणिपूरमधील खामेनलोक भागातील एका गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार व दहा लोक जखमी झाले आहेत. मैतेई जमातीची बहुसंख्या असलेला इम्फाळ पूर्व जिल्हा व कांगपोकी या आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कुकी जमातीच्या गावाला मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी वेढा दिला. त्यावेळी दहशतवादी व गावकऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. मात्र, या घटनेनंतर इम्फाळ पूर्व व इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी शिथिल करण्याचा कालावधी कमी केला आहे. मणिपूरमधील १६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये मैतेई व कुकी जमातींमध्ये गेल्या महिनाभरातील हिंसाचारात १००हून अधिक लोकांचा मृत्यू व ३१०पेक्षा अधिक जण जखमी झाले. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मैतेई जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी ३ मे रोजी मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यांत मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर या राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला.

या राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर काही काळ मणिपूरमध्ये शांतता होती; पण आता पुन्हा हिंसक घटना घडल्या. (वृत्तसंस्था)

‘डबल इंजिन’चे सरकार अपयशी का ठरले?

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी का ठरत आहे, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. त्या राज्यातील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी एक बैठकही घेतली नाही, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारterroristदहशतवादी