शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वायूप्रदूषणामुळे मुंबई, दिल्लीत वर्षभरात ८० हजार लोकांचा मृत्यू

By admin | Updated: January 19, 2017 12:33 IST

वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तब्बल ८०, ६६५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी, मुंबईच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली असून मृतांचा हा आकडा १९९५ सालापेक्षा दुप्पट असल्याचे समजते. एवढेच नव्ह तर दिल्ली व मुंबई या दोन्ही शहरांचे वायूप्रदूषणामुळे २०१५साली सुमारे ७० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 
दर दशकानंतर वायू प्रदूषणामुळे आरोग्य आणि पर्यायाने उत्पादन क्षमतेवर होणा-या विपरीत परिणामांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आलेल्या या अभ्यासात, हवेतील धुलीकणांचे प्रमाण, लोकसंख्या व मृत्यूदर यांच्या परिणामांची सांगड घालण्यात आली आहे. लेखिका कमल ज्योती माजी यांनी या संदर्भात अभ्यास केला असून 'एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च जनरल'मध्ये ही माहिती प्रकाशित झाली आहे. 
दिल्लीतील वायूप्रदूषणाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे होणा-या अकाली मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. १९९५ साली १९,७१६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, २०१५ साली हाच आकडा ४८,६५१ पोहोचल्याचे दिसून आले. तर मुंबईत १९९५ साली १९,२९१ जणांनी जीव गमावला होती, २०१५ साली तो आकडा ३२,०१४ वर गेला.