शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वायूप्रदूषणामुळे मुंबई, दिल्लीत वर्षभरात ८० हजार लोकांचा मृत्यू

By admin | Updated: January 19, 2017 12:33 IST

वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तब्बल ८०, ६६५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी, मुंबईच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली असून मृतांचा हा आकडा १९९५ सालापेक्षा दुप्पट असल्याचे समजते. एवढेच नव्ह तर दिल्ली व मुंबई या दोन्ही शहरांचे वायूप्रदूषणामुळे २०१५साली सुमारे ७० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 
दर दशकानंतर वायू प्रदूषणामुळे आरोग्य आणि पर्यायाने उत्पादन क्षमतेवर होणा-या विपरीत परिणामांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आलेल्या या अभ्यासात, हवेतील धुलीकणांचे प्रमाण, लोकसंख्या व मृत्यूदर यांच्या परिणामांची सांगड घालण्यात आली आहे. लेखिका कमल ज्योती माजी यांनी या संदर्भात अभ्यास केला असून 'एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च जनरल'मध्ये ही माहिती प्रकाशित झाली आहे. 
दिल्लीतील वायूप्रदूषणाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे होणा-या अकाली मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. १९९५ साली १९,७१६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, २०१५ साली हाच आकडा ४८,६५१ पोहोचल्याचे दिसून आले. तर मुंबईत १९९५ साली १९,२९१ जणांनी जीव गमावला होती, २०१५ साली तो आकडा ३२,०१४ वर गेला.