शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वायूप्रदूषणामुळे मुंबई, दिल्लीत वर्षभरात ८० हजार लोकांचा मृत्यू

By admin | Updated: January 19, 2017 12:33 IST

वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - वायूप्रदूषणामुळे २०१५ साली राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईत ३० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तब्बल ८०, ६६५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी, मुंबईच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली असून मृतांचा हा आकडा १९९५ सालापेक्षा दुप्पट असल्याचे समजते. एवढेच नव्ह तर दिल्ली व मुंबई या दोन्ही शहरांचे वायूप्रदूषणामुळे २०१५साली सुमारे ७० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 
दर दशकानंतर वायू प्रदूषणामुळे आरोग्य आणि पर्यायाने उत्पादन क्षमतेवर होणा-या विपरीत परिणामांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. आयआयटी मुंबईतर्फे करण्यात आलेल्या या अभ्यासात, हवेतील धुलीकणांचे प्रमाण, लोकसंख्या व मृत्यूदर यांच्या परिणामांची सांगड घालण्यात आली आहे. लेखिका कमल ज्योती माजी यांनी या संदर्भात अभ्यास केला असून 'एन्व्हॉयर्मेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च जनरल'मध्ये ही माहिती प्रकाशित झाली आहे. 
दिल्लीतील वायूप्रदूषणाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे होणा-या अकाली मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. १९९५ साली १९,७१६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, २०१५ साली हाच आकडा ४८,६५१ पोहोचल्याचे दिसून आले. तर मुंबईत १९९५ साली १९,२९१ जणांनी जीव गमावला होती, २०१५ साली तो आकडा ३२,०१४ वर गेला.