शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बिहारमधील ८० टक्के मतदार पैसे घेऊन मतदान करण्यास राजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2015 12:44 IST

बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणुक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. ७ - बिहारमधील ८० टक्के लोकांना मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात काहीच गैर वाटत नसल्याचे बिहारच्या निवडणुक आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानंतर बिहारच्या निवडणूक आयोगाने आमीषाला बळी न पडता मतदान करावे यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बिहार निवडणूक आयोगाने जनतेमधील मतदानाविषयीचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी पाटण्यातील चंद्रगुप्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने सर्वेक्षण केले आहे. जून - जुलै २०१५ याकालावधीत सुमारे ४,५०० जणांची मतं या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली.  यामध्ये ८० टक्के लोकांनी मतदानासाठी पैसे किंवा भेटवस्तू स्वीकारण्यात गैर नसल्याचे सांगितले.  निवडणूक आयोगानेही या सर्वेक्षणाची दखल घेतली मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. रेडिओ, वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमीषाला बळी न पडता मतदान करा असे आवाहन केले जात आहे.  २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत ५२.६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. तर लोकसभा निवडणुकीत हे प्रमाण ५६.२८ टक्क्यांवर पोहोचले होते. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत मतदार राज्याबाहेर असल्याने मतदानाचे प्रमाण कमी होते. याशिवाय मतदान केंद्रावरील लांबच लांब रागांमुळेही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. यंदा मतदानादरम्यान दिवाळीची सुट्टी असल्याने मतदार गावी परततील आणि मतदानाचे प्रमाण वाढेल अशी आशा वर्तवली जात आहे.