शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रतिभावान विद्यार्थ्यांना ७५ हजार स्कॉलरशिप, पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:33 IST

देशातील उच्च विद्याविभूषितांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर केली असून, त्याद्वारे प्रतिभावान विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊ नये, म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : देशातील उच्च विद्याविभूषितांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर केली असून, त्याद्वारे प्रतिभावान विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊ नये, म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, दरवर्षी टॅलेंट छाननीद्वारे निवडलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना दरमहा ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.प्रतिभावान विद्यार्थी तीन कारणांसाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात, असे सांगून जावडेकर म्हणाले की, परदेशात संशोधनासाठी आधुनिक तंत्रसामुग्रीने सज्ज उत्तम प्रयोगशाळा असतात. तिथे उच्च शिक्षणासाठी आकर्षक शिष्यवृत्त्या व आंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले मार्गदर्शक मिळतात. या तिन्ही सुविधा देशातच उपलब्ध करून देण्याचे सरकारने ठरविले आहे, शिवाय ही शिष्यवृत्तीही दिली जाईल.भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची २0 विद्यापीठे असावीत आणि जगातील पहिल्या २00 विद्यापीठांमध्ये त्यांची गणना व्हावी, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध स्तरांवर प्रयत्न चालविले आहेत. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या हेतूने, विविध योजनांसाठी २0 हजार कोटी रुपयांच्या खर्चास सरकारने मंजुरी दिली आहे, असेही जावडेकर म्हणाले.>लोगो बनविणाºयांसाठी पुरस्कारउच्च शिक्षण स्तरावर टॅलेंट व नावीन्याला वाव मिळावा, यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धाही आयोजित करण्यात येतील. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संशोधनासाठी एक स्पर्धा असेल आणि त्यासाठी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पुरस्कार असतील. मोदी सरकारच्या ‘न्यू इंडिया’ उपक्रमाचा लोगो बनविणाºया विजेत्याला ५0 हजारांचा पुरस्कार दिला जाईल.