शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

75 दिवसात जयललितांना एकदाही भेटू दिले नाही - पनीरसेल्वम

By admin | Updated: February 8, 2017 10:48 IST

अण्णाद्रमुकमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे निर्माण करण्यात आलेले चित्र अखेर आभासीच ठरले आहे.

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 8 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे निर्माण करण्यात आलेले चित्र अखेर आभासीच ठरले आहे. मुख्यमंत्रीपद आणि पक्षावर वर्चस्व मिळवण्यावरुन पक्षाच्या सरचिटणीस शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या सामना सुरु झाला आहे. 
 
बुधवारी सकाळी पनीरसेल्वम यांनी पुन्हा शशिकला यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. जयललिता यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांना साधे पाहण्याची सुध्दा मला अनुमती मिळाली नाही. मी 75 दिवस रोज अपोलो रुग्णालयात जात होतो पण एकदिवसही मला त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही असे पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. 
 
शशिकला यांना मुख्यमंत्री बनण्याची इतकी घाई का झाली आहे ? त्यांना परिस्थिती समजत नाही का ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पनीरसेल्वम यांचे हे आरोप थेट शशिकला यांच्याबद्दलच्या संशयाला बळकटी देणारे आहेत. त्यामुळे येणा-या दिवसांमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. 
 
आणखी वाचा 
 
शशिकला आणि पनीरसेल्वम दोघेही जयललिता यांच्या निकट होते. पण स्वत: रुग्णालयात असताना जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्यावर सोपवली होती. शशिकला जयललिता यांच्यासोबत राहत होत्या. शशिकलांवर इतका विश्वास होता तर, मग मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर का सोपवली नाही असा सवाल विरोधक विचारत आहेत.