शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

72 तासांत पोलिसांनी लावला 27 बेपत्ता मुलींचा शोध

By admin | Updated: April 18, 2017 14:12 IST

पोलीस महासंचालकांनी सर्व प्रलंबित प्रकरणं बाहेर काढत परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या 39 मुलींचा तात्काळ शोध घेण्याचा आदेश दिला होता

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - पोलिसांनी मनावर घेतलं तर वेळेच्या आधीच आपलं काम पुर्ण करु शकतात. याचं एक उत्तम उदाहरण शाहजहानपूर पोलिसांनी दिलं आहे. वरिष्ठ अधिका-याकडून मिळालेल्या आदेशानंतर पोलिसांनी एका रात्रीत शाहजहानपूरमधून बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध लावला. पोलीस महासंचालक के बी सिंह यांनी सर्व प्रलंबित प्रकरणं बाहेर काढत पोलिसांना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या 39 मुलींचा तात्काळ शोध घेण्याचा आदेश दिला होता. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत काही तासांतच 27 बेपत्ता मुलींचा शोध लावला. 
 
पोलिसांनी फक्त 72 तासांत 27 मुलींचा शोध लावला असून अजून 12 मुलींचा शोध लागणं बाकी आहे. परिसरातील सर्व पोलिसांना "करा किंवा मरा" असा आदेशच देण्यात आला होता. आपल्या कामात हलगर्जीपणा करणा-या आठ पोलीस उपनिरीक्षकांची आधीच बदली करण्यात आली आहे, तर 24 पोलीस अधिका-यांना 48 तासांच्या आत चांगली कामगिरी करुन दाखवा असं सांगण्यात आलं आहे. 
 
शाहजहानपूर परिसरात अपहरणाची 39 प्रकरणं प्रलंबित होती. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. 2016 पासून ही प्रकरणं प्रलंबित होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता, जे प्रकरण 2015 पासून प्रलंबित होतं. के बी सिंह यांनी दिलेल्या आदेशानंतर या अल्पवयीन मुलीच्या तपासाला गती मिळाली आणि तिचा शोध लावण्यात आला. 
 
पोलिसांनी फक्त आसपासच्या परिसरातूनच नाही तर दूरच्या गाव, शहरांमधूनही बेपत्ता मुलींचा शोध लावला. दोन मुलींना 30 किमी लांब, तर इतर तिघींना 55 किमी लांब परिसरातून वाचवण्यात आलं. एका मुलीला चंदीगड तर दुसरीला अलाहाबादमधून परत आणण्यात आलं.
 
बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पुर्ण सूट दिली गेली होती असं एका अधिका-याने सांगितलं आहे. लवकरात लवकर मुलींचा शोध घेत त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांना पोहचवा असा आदेश त्यांना देण्यात आला होता.
एका अधिका-याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, "सुटका करण्यात आलेल्या अनेक मुली अल्पवयीन आहेत. यामधील अनेक मुली स्वत:हून घरातून पळून गेल्या होत्या. लग्न करण्याच्या हेतूने घरातून पळालेल्या या मुली ज्यांच्यासोबत गेल्या होत्या त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल".