शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

72 तासांत पोलिसांनी लावला 27 बेपत्ता मुलींचा शोध

By admin | Updated: April 18, 2017 14:12 IST

पोलीस महासंचालकांनी सर्व प्रलंबित प्रकरणं बाहेर काढत परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या 39 मुलींचा तात्काळ शोध घेण्याचा आदेश दिला होता

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - पोलिसांनी मनावर घेतलं तर वेळेच्या आधीच आपलं काम पुर्ण करु शकतात. याचं एक उत्तम उदाहरण शाहजहानपूर पोलिसांनी दिलं आहे. वरिष्ठ अधिका-याकडून मिळालेल्या आदेशानंतर पोलिसांनी एका रात्रीत शाहजहानपूरमधून बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध लावला. पोलीस महासंचालक के बी सिंह यांनी सर्व प्रलंबित प्रकरणं बाहेर काढत पोलिसांना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या 39 मुलींचा तात्काळ शोध घेण्याचा आदेश दिला होता. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत काही तासांतच 27 बेपत्ता मुलींचा शोध लावला. 
 
पोलिसांनी फक्त 72 तासांत 27 मुलींचा शोध लावला असून अजून 12 मुलींचा शोध लागणं बाकी आहे. परिसरातील सर्व पोलिसांना "करा किंवा मरा" असा आदेशच देण्यात आला होता. आपल्या कामात हलगर्जीपणा करणा-या आठ पोलीस उपनिरीक्षकांची आधीच बदली करण्यात आली आहे, तर 24 पोलीस अधिका-यांना 48 तासांच्या आत चांगली कामगिरी करुन दाखवा असं सांगण्यात आलं आहे. 
 
शाहजहानपूर परिसरात अपहरणाची 39 प्रकरणं प्रलंबित होती. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी वारंवार तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. 2016 पासून ही प्रकरणं प्रलंबित होती. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता, जे प्रकरण 2015 पासून प्रलंबित होतं. के बी सिंह यांनी दिलेल्या आदेशानंतर या अल्पवयीन मुलीच्या तपासाला गती मिळाली आणि तिचा शोध लावण्यात आला. 
 
पोलिसांनी फक्त आसपासच्या परिसरातूनच नाही तर दूरच्या गाव, शहरांमधूनही बेपत्ता मुलींचा शोध लावला. दोन मुलींना 30 किमी लांब, तर इतर तिघींना 55 किमी लांब परिसरातून वाचवण्यात आलं. एका मुलीला चंदीगड तर दुसरीला अलाहाबादमधून परत आणण्यात आलं.
 
बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना पुर्ण सूट दिली गेली होती असं एका अधिका-याने सांगितलं आहे. लवकरात लवकर मुलींचा शोध घेत त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांना पोहचवा असा आदेश त्यांना देण्यात आला होता.
एका अधिका-याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, "सुटका करण्यात आलेल्या अनेक मुली अल्पवयीन आहेत. यामधील अनेक मुली स्वत:हून घरातून पळून गेल्या होत्या. लग्न करण्याच्या हेतूने घरातून पळालेल्या या मुली ज्यांच्यासोबत गेल्या होत्या त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल".