शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नव्या वर्षात ७० हजार कोटींचे आयपीओ

By admin | Updated: January 1, 2015 03:29 IST

समभाग विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून २०१५ च्या वर्षात तब्बल ७० हजार कोटी रुपये मूल्याचे आयपीओ भारतीय शेअर बाजारात येणार आहे.

मनोज गडनीस - मुंबई गेल्या सव्वा वर्षापासून भारतीय शेअर बाजारात तेजीने परतावा केल्यानंतर आता अनेक कंपन्यांनी विस्तारासाठी बाजारातून भांडवल उभारणी करण्याच्या दृष्टीने आयपीओ (इनिशियल पब्लिक आॅफर), समभाग विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून २०१५ च्या वर्षात तब्बल ७० हजार कोटी रुपये मूल्याचे आयपीओ भारतीय शेअर बाजारात येणार आहे. लहान-मोठ्या अशा सुमारे ४३ कंपन्यांनी भांडवली बाजार नियमन संस्था असलेल्या ‘सेबी’कडे भांडवल उभारणीच्या परवानगीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून फेब्रुवारीपर्यंत यापैकी बहुतांश कंपन्यांना हिरवा कंदील मिळेल, अशी माहिती आहे. देशात आगामी वर्षात रस्ते, वीज प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प, हॉटेल सेवा, बांधकाम उद्योग, शेती प्रक्रिया उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तु निर्मिती करणाऱ्या कंपन्या अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने नवरत्न, महारत्न अशा काही कंपन्यांतील निर्गुंतवणुकीची घोषणा यापूर्वीच करताना त्याद्वारे ४४ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारणी करण्याचे लक्ष्य निश्चित ठेवले होते. निर्गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या सहापैकी तीन कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीला भरभरून प्रतिसाद आल्याने बाजाराचेही मनोबल उंचावले आहे. शेअर बाजारातील तेजी आणि आगामी काळात येणारे आयपीओ या संदर्भात विश्लेषण करताना अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले की, स्थिर आर्थिक सरकार ही एक मोठी गोष्ट आहे. तसेच, आर्थिक सुधारणा कार्यक्रमाबाबत सरकारने जे संकेत दिले आहेत त्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.पण, या घोषणा प्रत्यक्षात येणे आणि त्यांची अंमलबजावणी जर नियोजनानुसार झाली तर निश्चितच आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणी करू पाहणाऱ्या कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कोळसा, वीमा आणि जमीन अधिग्रहणासंदर्भात अध्यादेश काढून आर्थिक सुधारणा कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट केल्यानंतर आता २०१५ मध्येही भारतीय शेअर बाजाराचा कल हा तेजीकडेच असेल, असे चित्र दिसत आहे.च्आजवर आयपीओच्या माध्यमातून अनेक मोठ्या, नामांकित कंपन्यांनी भांडवल उभारणी केली असली तरी सामान्य गुंतवणूकदारांचा त्यातील राखीव वाटा हा अत्यल्प होता. च्परदेशी वित्तीय संस्था, निकषपात्र वित्तीय संस्था, देशी वित्तीय संस्था यांच्याच पदरात भरभरून समभाग पडत होते.च्चालू आर्थिक वर्षात सेबीने या निकषात बदल करत आयपीओच्या एकूण आकारमानापैकी १० टक्के हे सामान्य गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. पूर्वीच्या तुलनेत हा कोटा दुप्पट केल्याने याचा निश्चित फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.