शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजाराम नगरात पाण्यासाठी पायपीट एका कुपनलिकेवर ७० घरांचे पाणी : मनपाची पाणी पुरवठा व्यवस्था नसल्याने जलसंकट

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.

तीन गृहनिर्माण सोसायटींची स्थापना
कानळदा रस्त्यावरील राजाराम नगराच्या जागेवर आकांक्षा गृहनिर्माण सोसायटी, अक्षय गृहनिर्माण सोसायटी व अक्षरा गृहनिर्माण सोसायटीची २००७ मध्ये स्थापना केली. या सोसायटीत शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक यांच्यासह शासकीय नोकर व काही खाजगी व्यावसायिकांना प्लॉट देण्यात आले.

सहा ते १५ लाखांपर्यंत घरे
शासकीय कर्मचार्‍यांसाठी तयार करण्यात आलेल्या या गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांना सुरुवातीला चार लाख ३१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कर्ज प्रकरणी झालेले नसल्याने पुन्हा दीड लाखांची रक्कम भरण्यास सांगितले. सरकारी नोकरी नसलेल्या नागरिकांना तब्बल १४ ते १५ लाख रुपये मोजून घर दिले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

पाणी व वीजसाठी स्वतंत्र रक्कम
गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांना घर देतेवेळी पिण्याचे पाणी व वीज याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्याबदल्यात २५ हजार रुपयांची जादा रक्कम प्रत्येक कुटुंबाकडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या भागातील नागरिकांना ना वीज मिटर मिळाले ना पिण्याचे पाणी.

रहिवाशांचे हाल
गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी सुरुवातील या भागात एक बोअरींग करून दिली आहे. या बोअरींगवरून राजाराम नगरातील ७० ते ७५ कुटुंब पाणी भरत आहेत. त्यातच पिण्याचे पाणी हे शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, खडके चाळ या भागातून आणत आहेत. काही कुटुंबांनी स्वतंत्र बोअरींग करीत पाण्याची व्यवस्था केली आहे.

ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी
राजाराम नगर हा भाग आव्हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे. या भागात मनपाची स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणा नसल्याने नागरिकांनी आव्हाणे ग्रामपंचायतीला विनंती करून पिण्याचे पाणी व गटारी उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती केली. मात्र आव्हाणे ग्रामपंचायतीने अद्याप दखल घेतलेली नाही. मनपाने वाघ नगराच्या धर्तीवर या भागापर्यंत पाईपलाईन करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.