शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

राजाराम नगरात पाण्यासाठी पायपीट एका कुपनलिकेवर ७० घरांचे पाणी : मनपाची पाणी पुरवठा व्यवस्था नसल्याने जलसंकट

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७० ते ७५ घरे अवलंबून आहेत.

तीन गृहनिर्माण सोसायटींची स्थापना
कानळदा रस्त्यावरील राजाराम नगराच्या जागेवर आकांक्षा गृहनिर्माण सोसायटी, अक्षय गृहनिर्माण सोसायटी व अक्षरा गृहनिर्माण सोसायटीची २००७ मध्ये स्थापना केली. या सोसायटीत शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक यांच्यासह शासकीय नोकर व काही खाजगी व्यावसायिकांना प्लॉट देण्यात आले.

सहा ते १५ लाखांपर्यंत घरे
शासकीय कर्मचार्‍यांसाठी तयार करण्यात आलेल्या या गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांना सुरुवातीला चार लाख ३१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर कर्ज प्रकरणी झालेले नसल्याने पुन्हा दीड लाखांची रक्कम भरण्यास सांगितले. सरकारी नोकरी नसलेल्या नागरिकांना तब्बल १४ ते १५ लाख रुपये मोजून घर दिले असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

पाणी व वीजसाठी स्वतंत्र रक्कम
गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांना घर देतेवेळी पिण्याचे पाणी व वीज याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्याबदल्यात २५ हजार रुपयांची जादा रक्कम प्रत्येक कुटुंबाकडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या भागातील नागरिकांना ना वीज मिटर मिळाले ना पिण्याचे पाणी.

रहिवाशांचे हाल
गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी सुरुवातील या भागात एक बोअरींग करून दिली आहे. या बोअरींगवरून राजाराम नगरातील ७० ते ७५ कुटुंब पाणी भरत आहेत. त्यातच पिण्याचे पाणी हे शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, खडके चाळ या भागातून आणत आहेत. काही कुटुंबांनी स्वतंत्र बोअरींग करीत पाण्याची व्यवस्था केली आहे.

ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी
राजाराम नगर हा भाग आव्हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत आहे. या भागात मनपाची स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणा नसल्याने नागरिकांनी आव्हाणे ग्रामपंचायतीला विनंती करून पिण्याचे पाणी व गटारी उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती केली. मात्र आव्हाणे ग्रामपंचायतीने अद्याप दखल घेतलेली नाही. मनपाने वाघ नगराच्या धर्तीवर या भागापर्यंत पाईपलाईन करावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे.