शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

सेंद्रीय शेतीसाठी ७० कोटींची तरतूद एकनाथराव खडसे : तूर संशोधन केंद्राला १५० हेक्टर जमीन ; फळपिकांसाठी १०० टक्के अनुदान

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करीत असताना शेती विकसित करणे गरजेचे आहे. शासनानतर्फे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तूर संशोधन केंद्र, केळी दर्जा वाढ केंद्र, शेती औजार संशोधन केंद्रासाठी जिल्‘ात जमिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर केळी खोडावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरुळ येथील प्रकल्पाला ६ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी लाडवंजारी समाज मंगल कार्यालयातील शेतकरी मेळाव्यात दिली.

जळगाव : नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करीत असताना शेती विकसित करणे गरजेचे आहे. शासनानतर्फे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तूर संशोधन केंद्र, केळी दर्जा वाढ केंद्र, शेती औजार संशोधन केंद्रासाठी जिल्‘ात जमिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर केळी खोडावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरुळ येथील प्रकल्पाला ६ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी लाडवंजारी समाज मंगल कार्यालयातील शेतकरी मेळाव्यात दिली.
तूर दाळ संशोधन केंद्रासाठी १५० हेक्टर जमीन
जळगाव जिल्हा हा कडधान्यांसाठी प्रसिद्ध होता. जळगावची दालनगरी म्हणून ओळख होती. मात्र अलिकडे हे उत्पादन घटले आहे. दाळीवर संशोधन व्हावे यासाठी बोदवड येथे तूर दाळ संशोधन केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. त्यातच या केंद्रासाठी १५० हेक्टर जमिनीदेखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यासह हिंगोणा येथे केळी दर्जा वाढ केंद्रासाठी ५२ एकर, शेती औजार संशोधन केंद्रासाठी ३५ एकर जमीन मिळाली आहे. तर पिंपरुळ, ता.यावल येथील केळी खोडावर प्रक्रिया प्रकल्पासाठी ६ कोटी ९५ लाखांचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रीय शेतीसाठी ७० कोटींची तरतूद
शेती करीत असताना सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने ७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी काळात ही ७०० कोटींपर्यंत करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीसोबत फळपिकांची लागवड करावी त्यासाठी १०० टक्के अनुदान देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाने शेतकर्‍यांना विमा संरक्षण मिळवून दिले आहे. त्यासाठीची रक्कम ही शासनाने भरलेली आहे.
शेतमालावरील प्रक्रिया युनिटसाठी ५० टक्के अनुदान
सध्या शेती औजारे महाग झाली आहे. त्यामुळे छोट्या शेतकर्‍याला शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी समूह शेती केल्यास त्यांना शासन मदत करेल. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या मालाचे मार्केटींग हे महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन प्रक्रिया युनिटची उभारणी करावी. त्यासाठी शासन ५० टक्के अनुदान देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. शासनाला निधीची मर्यादा असेलतर सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देऊ असे त्यांनी सांगितले.