शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेतीसाठी ७० कोटींची तरतूद एकनाथराव खडसे : तूर संशोधन केंद्राला १५० हेक्टर जमीन ; फळपिकांसाठी १०० टक्के अनुदान

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करीत असताना शेती विकसित करणे गरजेचे आहे. शासनानतर्फे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तूर संशोधन केंद्र, केळी दर्जा वाढ केंद्र, शेती औजार संशोधन केंद्रासाठी जिल्‘ात जमिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर केळी खोडावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरुळ येथील प्रकल्पाला ६ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी लाडवंजारी समाज मंगल कार्यालयातील शेतकरी मेळाव्यात दिली.

जळगाव : नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करीत असताना शेती विकसित करणे गरजेचे आहे. शासनानतर्फे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच तूर संशोधन केंद्र, केळी दर्जा वाढ केंद्र, शेती औजार संशोधन केंद्रासाठी जिल्‘ात जमिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर केळी खोडावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरुळ येथील प्रकल्पाला ६ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी लाडवंजारी समाज मंगल कार्यालयातील शेतकरी मेळाव्यात दिली.
तूर दाळ संशोधन केंद्रासाठी १५० हेक्टर जमीन
जळगाव जिल्हा हा कडधान्यांसाठी प्रसिद्ध होता. जळगावची दालनगरी म्हणून ओळख होती. मात्र अलिकडे हे उत्पादन घटले आहे. दाळीवर संशोधन व्हावे यासाठी बोदवड येथे तूर दाळ संशोधन केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. त्यातच या केंद्रासाठी १५० हेक्टर जमिनीदेखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यासह हिंगोणा येथे केळी दर्जा वाढ केंद्रासाठी ५२ एकर, शेती औजार संशोधन केंद्रासाठी ३५ एकर जमीन मिळाली आहे. तर पिंपरुळ, ता.यावल येथील केळी खोडावर प्रक्रिया प्रकल्पासाठी ६ कोटी ९५ लाखांचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रीय शेतीसाठी ७० कोटींची तरतूद
शेती करीत असताना सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने ७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी काळात ही ७०० कोटींपर्यंत करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीसोबत फळपिकांची लागवड करावी त्यासाठी १०० टक्के अनुदान देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाने शेतकर्‍यांना विमा संरक्षण मिळवून दिले आहे. त्यासाठीची रक्कम ही शासनाने भरलेली आहे.
शेतमालावरील प्रक्रिया युनिटसाठी ५० टक्के अनुदान
सध्या शेती औजारे महाग झाली आहे. त्यामुळे छोट्या शेतकर्‍याला शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी समूह शेती केल्यास त्यांना शासन मदत करेल. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या मालाचे मार्केटींग हे महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन प्रक्रिया युनिटची उभारणी करावी. त्यासाठी शासन ५० टक्के अनुदान देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. शासनाला निधीची मर्यादा असेलतर सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देऊ असे त्यांनी सांगितले.