शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

यूपीत ६१ टक्के मतदान

By admin | Updated: February 20, 2017 01:20 IST

निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात

लखनौ : निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के  मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात शांततेत मतदान झाल्याचे वृत्त आहे. मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी ही माहिती दिली. राज्यात तिसऱ्या टप्प्यात फर्रखाबाद, हरदोई, कन्नौज, मैनपुरी, इटावा, औरैया, कानपूर ग्रामीण, कानपूर, उन्नाव, लखनौ, बाराबंकी आणि सीतापूर जिल्ह्यात ६९ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. तथापि, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिसऱ्या टप्प्यात १०५ महिलांसह एकूण ८२६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६४ तर दुसऱ्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झाले होते. इटावात जसवंतनगर मतदारसंघात कतैयापुरा येथे मतदारांना धमकविण्याची तक्रार होती. त्यानंतर येथे दाखल झालेले सपाचे उमेदवार शिवपाल सिंह यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. जसवंतनगरमधील सपाचे नगराध्यक्ष राहुल गुप्ता व त्यांचे समर्थक मतदान केंद्राजवळ बसले होते. यावरुन त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी या नेत्यांवर कथित लाठीमार केला.नेत्यांचे मतदान २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सपाने ६९ पैकी ५५ जागा मिळविल्या होत्या. बसपाला सहा, भाजपला पाच तर काँंग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. अपक्षाला एक जागा मिळाली होती. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रीराजनाथ सिंह, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौ मतदारसंघात मतदान केले. तर, मुख्यमंत्री अखिलेश यादव व मुलायम सिंह यादव यांनी इटावात सैफई येथे मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात जे प्रमुख उमेदवार होते त्यात मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम सिंह यांची सून अपर्णा, विद्यमान आमदार रीता बहुगुणा जोशी, कॅबिनेट मंत्री अरविंद सिंह गोप, राज्यमंत्री फरीद महफूज किदवई यांचा समावेश आहे. राज्यात पुढील टप्प्यातील मतदान २३ व २७ फेब्रुवारी, ४ व ८ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणी ११ मार्च रोजी होईल.