शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

यूपीत ६१ टक्के मतदान

By admin | Updated: February 20, 2017 01:20 IST

निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात

लखनौ : निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात रविवारी ६१.१६ टक्के  मतदान झाले आहे. किरकोळ घटना वगळता या १२ जिल्ह्यांच्या ६९ मतदारसंघात शांततेत मतदान झाल्याचे वृत्त आहे. मुख्य निवडणूक अधिकारी टी. व्यंकटेश यांनी ही माहिती दिली. राज्यात तिसऱ्या टप्प्यात फर्रखाबाद, हरदोई, कन्नौज, मैनपुरी, इटावा, औरैया, कानपूर ग्रामीण, कानपूर, उन्नाव, लखनौ, बाराबंकी आणि सीतापूर जिल्ह्यात ६९ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.१६ टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. तथापि, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिसऱ्या टप्प्यात १०५ महिलांसह एकूण ८२६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६४ तर दुसऱ्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झाले होते. इटावात जसवंतनगर मतदारसंघात कतैयापुरा येथे मतदारांना धमकविण्याची तक्रार होती. त्यानंतर येथे दाखल झालेले सपाचे उमेदवार शिवपाल सिंह यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. जसवंतनगरमधील सपाचे नगराध्यक्ष राहुल गुप्ता व त्यांचे समर्थक मतदान केंद्राजवळ बसले होते. यावरुन त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी या नेत्यांवर कथित लाठीमार केला.नेत्यांचे मतदान २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सपाने ६९ पैकी ५५ जागा मिळविल्या होत्या. बसपाला सहा, भाजपला पाच तर काँंग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. अपक्षाला एक जागा मिळाली होती. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रीराजनाथ सिंह, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौ मतदारसंघात मतदान केले. तर, मुख्यमंत्री अखिलेश यादव व मुलायम सिंह यादव यांनी इटावात सैफई येथे मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात जे प्रमुख उमेदवार होते त्यात मुलायम सिंह यांचे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम सिंह यांची सून अपर्णा, विद्यमान आमदार रीता बहुगुणा जोशी, कॅबिनेट मंत्री अरविंद सिंह गोप, राज्यमंत्री फरीद महफूज किदवई यांचा समावेश आहे. राज्यात पुढील टप्प्यातील मतदान २३ व २७ फेब्रुवारी, ४ व ८ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणी ११ मार्च रोजी होईल.