शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

61 टक्के दिल्लीकर केजरीवालांच्या कामगिरीवर नाखूश : सर्व्हे

By admin | Updated: February 9, 2017 17:32 IST

येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 9 -  येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील  अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले सरकार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले केजरीवाल स्थानिक मुद्यांपासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत सर्वांवर हिरिरीने आपले मत मांडतात. मात्र केजरीवाल यांच्या दोन वर्षांच्या कामकाजाबाबत तब्बल 61 टक्के  दिल्लीकर मात्र नाखूश असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. 
संध्या टाइम्सने केलेल्या या सर्व्हेमध्ये  61 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की ते केजरीवाल सरकारच्या कामगिरीवर नाखूश आहेत. तर 34 टक्के लोकांनी दिल्ली सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र 4 टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीही मत नोंदवलेले नाही. संध्या टाइम्सने 550 लोकांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत हा सर्व्हे केला आहे. या सर्वेत भ्रष्टाचार, जनलोकपाल, केंद्र सरकारसोबतचे विवाद आणि महिला संरक्षण या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले होते. 
एकीकडे आप सरकारची  लोकप्रियता कमी झालेली असतानाच  केजरीवाल यांच्या लोकप्रियतेतही कमालीची घट झाली आहे. केजरीवाल आणि भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना मुख्यमंत्रीपदारचे उमेदवार म्हणून समसमान पसंती मिळाली आहे. दोघांनाही प्रत्येकी 31.64 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसच्या अजय माकन यांना 18 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.  तसेच जनलोकपाल लागू करण्यात आणि भ्रष्टाचार कमी करण्यात केजरीवाल सरकार अपयशी ठरल्याचे मतही बहुसंख्य मतदारांनी नोंदवले आहे.