शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

61 टक्के दिल्लीकर केजरीवालांच्या कामगिरीवर नाखूश : सर्व्हे

By admin | Updated: February 9, 2017 17:32 IST

येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 9 -  येत्या 14 फेब्रुवारीला दिल्लीतील  अरविंद केजरीवाल यांच्या आप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांना चांगले सरकार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले केजरीवाल स्थानिक मुद्यांपासून राष्ट्रीय प्रश्नांपर्यंत सर्वांवर हिरिरीने आपले मत मांडतात. मात्र केजरीवाल यांच्या दोन वर्षांच्या कामकाजाबाबत तब्बल 61 टक्के  दिल्लीकर मात्र नाखूश असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. 
संध्या टाइम्सने केलेल्या या सर्व्हेमध्ये  61 टक्के दिल्लीकरांनी सांगितले की ते केजरीवाल सरकारच्या कामगिरीवर नाखूश आहेत. तर 34 टक्के लोकांनी दिल्ली सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र 4 टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीही मत नोंदवलेले नाही. संध्या टाइम्सने 550 लोकांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत हा सर्व्हे केला आहे. या सर्वेत भ्रष्टाचार, जनलोकपाल, केंद्र सरकारसोबतचे विवाद आणि महिला संरक्षण या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले होते. 
एकीकडे आप सरकारची  लोकप्रियता कमी झालेली असतानाच  केजरीवाल यांच्या लोकप्रियतेतही कमालीची घट झाली आहे. केजरीवाल आणि भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना मुख्यमंत्रीपदारचे उमेदवार म्हणून समसमान पसंती मिळाली आहे. दोघांनाही प्रत्येकी 31.64 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसच्या अजय माकन यांना 18 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे.  तसेच जनलोकपाल लागू करण्यात आणि भ्रष्टाचार कमी करण्यात केजरीवाल सरकार अपयशी ठरल्याचे मतही बहुसंख्य मतदारांनी नोंदवले आहे.