शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

५७० कोटी रुपये स्टेट बँकेचेच!

By admin | Updated: May 15, 2016 05:39 IST

तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांना शनिवारी तिरुपूर जिल्ह्यात तपासणीमध्ये तीन कंटेनर्समधून तब्बल ५७0 कोटी रुपयांचे घबाड हाती लागल्याने देशभर खळबळ माजली.

कोर्इंबतूर : तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांना शनिवारी तिरुपूर जिल्ह्यात तपासणीमध्ये तीन कंटेनर्समधून तब्बल ५७0 कोटी रुपयांचे घबाड हाती लागल्याने देशभर खळबळ माजली. त्यावर लगेच कोणीच दावा न केल्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने हा पैसा मतदारांना वाटला जाणार होता की काय, अशी शंका व्यक्त केली गेली. मात्र ती रक्कम आमची असल्याचा दावा रात्री स्टेट बँकेने केला आणि मग निवडणूक आयोगापासून सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यापूर्वी तीनदा मिळून राज्यातून निवडणूक अधिकाऱ्यांनी सुमारे १00 कोटी रुपये जप्त केले होते. मात्र आज एवढी मोठी रक्कम सापडल्याने संशय निर्माण झाला होता. तामिळनाडूतील प्रचार आज संपण्याआधी ती सापडल्याने शंकेत वाढच झाली होती. पहाटे तीन कंटेनरमधून निघालेली ही रक्कम जप्त करण्यात आली. तिरुपूरमधून तीन कंटेनर वेगाने जाताना पाहून निवडणूक अधिकाऱ्यांना शंका आली. कंटेनर व त्यापुढे पुढे असलेल्या दोन कार थांबवण्याचा प्रयत्नही असफल ठरला. त्यामुळे पाठलाग करून वाहने अडवली. वाहने का थांबवली नाही, असे त्यातील विचारले असता, दरोड्याच्या भीतीने आम्ही निघून न थांबता गेलो, असे त्यातील लोकांनी पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले. ही रक्कम बँकांतर्गत हस्तांतरणाची असल्याचा दावा वाहनांतील लोकांनी केला होता. कोर्इंबतूरमधील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून ५७० कोटी रुपये विशाखापट्टणम येथील बँकेच्या शाखेत हस्तांतरित करण्यात येणार होते, हे नंतर उघडच झाले.आवश्यक दस्तावेज नसल्याने स्टेट बँकेच्या कोर्इंबतूर व विशाखापट्टणम येथील अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा करण्यास बोलावून घेतल्यावर खुलासा झाला. त्यांनी प्राप्ती कर विभागालाही या प्रकाराची माहिती दिली. आंध्र प्रदेशात रोख नोटांचा तुटवडा असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने आम्हाला रक्कम पाठविण्यास सांगितली होती, त्यानुसार ही रक्कम पाठविली असल्याचे स्टेट बँकेतर्फे सांगण्यात आले.ही रक्कम बँकेची असेल, तर कंटेनरवर सील का नव्हते, कर्मचाऱ्यांकडे व्यवहाराची मूळ कागदपत्रे का नव्हती, असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला होता. मात्र कंटेनरच्या पुढील दोन वाहनांमध्ये आंध्रचे पोलीस होते, असा दावा बँकेने केला.आमच्या अधिकाऱ्यांनी मूळ कागदपत्रे निवडणूक आयोगाला दाखवली आहेत, असे स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक रमेश बाबू यांनी सांगितले. बँकेतर्फे ही रात्री तसा अधिकृत खुलासा करण्यात आल्याने वादावर पडदा पडला.