शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

५७ उद्योगपतींकडे थकले ८५ हजार कोटी रुपये

By admin | Updated: October 26, 2016 05:17 IST

देशातील केवळ ५७ लोकांकडे विविध बँकांचे ८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणात ही माहिती समोर आली.

नवी दिल्ली : देशातील केवळ ५७ लोकांकडे विविध बँकांचे ८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणात ही माहिती समोर आली.५00 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांची यादी तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने त्यावर ही माहिती न्यायालयास दिली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मोजक्या लोकांकडे थकलेल्या प्रचंड रकमेचा आकडा पाहून न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून म्हटले की, कर्ज घेऊन ते न फेडणारे हे लोक अखेर आहेत तरी कोण? या लोकांची नावे का माहिती होऊ नये? कर्ज मर्यादा ५00 कोटीपेक्षा कमी केल्यास थकलेल्या कर्जाचा आकडा एक लाख कोटीपेक्षा जास्त असेल, हे उघडच आहे. सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेने या संबंधीची याचिका दाखल केली आहे. याचिका कर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली. कर्ज थकविणाऱ्यांची नावे जाहीर करायची की नाहीत, या मुद्द्यावर आता २८ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. हजारो कोटी बुडविणारे सुखात, शेतकरी मात्र त्रस्तभारतीय बँकिंग व्यवस्थेतील अव्यवस्थेवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. न्यायालयाने म्हटले की, बुडीत कर्जांची वाढती रक्कम चिंताजनक आहे. लोक हजारो कोटी रुपये कर्ज घेतात. आपल्या कंपन्या दिवाळखोर घोषित करतात आणि नंतर पळून जातात. पंधरा-वीस हजारांचे कर्ज घेणारे गरीब शेतकरी मात्र त्रस्त होतात. रिझर्व्ह बँकेने देशहितासाठी काम लोक माहिती अधिकारात प्रश्न विचारत असतील, तर त्यांनी कर्ज परतफेड न करणारे हे लोक कोण आहेत, हे याची माहिती लोकांना मिळायला हवी. कर्ज थकविणाऱ्यांची माहिती का रोखायची?, असा सवाल न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला केले. रिझर्व्ह बँकेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, कर्ज थकविणाऱ्यांपैकी सर्वांनीच हेतूत: तसे केलेले नाही. रिझर्व्ह बँक बँकांच्या हितासाठी काम करीत आहे, तसेच कायद्यानुसार थकबाकीदारांची नावे जाहीर करता येत नाही. त्यावर न्यायालयाने सांगतिले की, रिझर्व्ह बँकेने बँकांच्या हितासाठी नव्हे, तर देशाच्या हितासाठी काम करावे.