शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

‘कांगारू कोर्टा’ने दिला ५३ जणांना मृत्युदंड

By admin | Updated: March 13, 2016 22:49 IST

मागील तीन वर्षांत देशातील पाच सर्वाधिक नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ‘कांगारू कोर्टा’ने ५३ जणांना दोषी ठरवून मृत्युदंड ठोठावल्यानंतर नक्षलवाद्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी करीत या सर्व लोकांना ठार मारले.

नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत देशातील पाच सर्वाधिक नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ‘कांगारू कोर्टा’ने ५३ जणांना दोषी ठरवून मृत्युदंड ठोठावल्यानंतर नक्षलवाद्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी करीत या सर्व लोकांना ठार मारले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये ‘कांगारू कोर्ट’ किंवा ‘जन अदालत’ने दिलेल्या आदेशानुसार १८ जणांना ते सर्व पोलिसांचे खबरे असल्याच्या किंवा माओवादी विचारधारा न मानल्याच्या आरोपावरून ठार मारण्यात आले.२०१५ मध्ये आंध्र प्रदेश (१), बिहार (६), छत्तीसगड (१४), झारखंड (१४) आणि ओडिशा (६) या पाच नक्षलग्रस्त राज्यांमध्ये नक्षलवाद्यांतर्फे एकूण ४१ जन अदालतचे आयोजन करण्यात आले होते. २०१४ मध्ये अशा ५४ जन अदालती भरविण्यात आल्या आणि या अदालतीच्या आदेशानुसार नक्षल्यांनी १५ जणांची हत्या केली, तर २०१३ मध्ये ६३ जन अदालती भरविण्यात आल्या आणि त्यांच्या आदेशानुसार नक्षल्यांनी २० जणांना ठार केले.लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी माओवादी अशा कांगारू कोर्ट किंवा जन अदालत किंवा प्रजा कोर्ट भरवून त्यात पोलिसांचा खबऱ्या किंवा माओवादी विचारधारा न मानणाऱ्यांना मृत्युदंड देतात, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २०१६ या वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत अशा दोन जन अदालतींचे आयोजन करण्यात आले आणि या दोन्ही छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आल्या. या नक्षलग्रस्त राज्यांमध्ये जवळपास एक लाखावर निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. असे असले तरी महाराष्ट्रासह सर्व दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये गेल्या २०१५ या एका वर्षात नक्षलवादाशी संबंधित हिंसाचाराच्या १,०८८ घटनांमध्ये माओवाद्यांतर्फे २२६ जणांची हत्या करण्यात आली. त्यात १६८ जण सर्वसामान्य नागरिक आणि ५८ सुरक्षा दलांचे जवान आहेत.या २०१५ मध्ये सुरक्षा दलांनी ८९ नक्षल्यांचा खात्मा केला, १,६६८ नक्षल्यांना अटक केली, तर ५७० नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)