शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

आंध्रप्रदेश सरकारची भिका-यांना पाच हजारांची 'भीक'

By admin | Updated: July 22, 2015 15:34 IST

आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री येथील पुष्करम महोत्सवादरम्यान भिका-यांनी नदीकिनारापासून दुर राहावे यासाठी आंध्र सरकारने भिका-यांसाठी एक भन्नाट योजना राबवली आहे.

ऑनलाइन लोकमत 

राजामुंद्री, दि. २२ - आंध्रप्रदेशमधील राजमुंद्री येथील पुष्करम महोत्सवादरम्यान भिका-यांनी नदीकिनारापासून दुर राहावे यासाठी आंध्र सरकारने भिका-यांसाठी एक भन्नाट योजना राबवली आहे. भिका-यांनी पुष्कर घाटापासून लांब राहावे व या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून तब्बल पाच हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा आंध्र सरकारने केली आहे. 
राजमुंद्री येथे सध्या पुष्करम महोत्सव सुरु असून दक्षिणेतील कुंभ मेळा म्हणून या उत्सवाला ओळखले जाते. या उत्सवात लाखो भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येतात.  आंध्र सरकारने या महोत्सवासाठी जय्यत तयार केली असून या उत्सवासाठी तब्बल १७ घाट तयार करण्यात आले आहे. १४ जुलैपासून हा उत्सव सुरु झाला आहे. या महोत्सवादरम्यान अनेक भिकारीही नदी किनारी जमतात व भीक मागतात. भिका-यांनी या महोत्सवापासून लांब राहावे यासाठी आंध्र सरकारने नवीन शक्कल लढवली आहे. यानुसार प्रत्येक भिका-याला ५ हजार रुपये दिले जातील पण या मोबदल्यात त्या भिका-याने महोत्सवाला जायचे नाही ही प्रमुख अट आहे. याशिवाय भिका-यांना मोफत जेवणही दिले जाईल असे अधिका-यांनी म्हटले आहे. ज्या भिका-यांकडे रेशनकार्ड नाही, जे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही अशा भिका-यांसाठीच ही योजना लागू आहे. मात्र अनेक स्थानिकही या योजनेचा लाभ घेण्यासाठी भिकारी बनून पुढे येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यावरही आंध्र सरकारने तोडगा काढला असून भिका-यांच्या बोटांचे ठसे घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. सर्व भिका-यांना सखोल तपासणीनंतरच या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती एका अधिका-याने दिली.