शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

५०० भारतीय इसिसकडे

By admin | Updated: June 1, 2016 03:53 IST

इसिस या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी ताज्या आकडेवारीनुसार ४०० ते ५०० भारतीय या संघटनेच्या तात्त्विक विचारसरणीकडे

नवी दिल्ली : इसिस या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी ताज्या आकडेवारीनुसार ४०० ते ५०० भारतीय या संघटनेच्या तात्त्विक विचारसरणीकडे आकर्षित झाल्याचे निष्पन्न झाले. गुप्तचर संस्थांनी लगेच छडा लावत त्यांचा विदेशात जाण्याचा डाव हाणून पाडला आहे.इसिसकडे आकर्षित झालेल्या भारतीयांमध्ये बहुतांश युवक असून वेबसाईटवर नियमितपणे संवाद साधत काहींनी इराक आणि सिरियामध्ये कसे पोहोचायचे याबाबत इसिसच्या काही लोकांशी संपर्कही साधला होता. इसिसने जगभरात ठेवलेल्या लक्ष्याबाबतही त्यांनी चर्चा केली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या हालचालीमुळे गुप्तचर संस्था, राज्य पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेला सातत्याने सतर्क राहावे लागले. तपास संस्थांनी बहुतांश युवकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता कोणत्याही गंभीर प्रकरणांमध्ये न गुंतलेल्यांचे समुपदेशन करीत त्यांना सोडून दिले. (वृत्तसंस्था)1इसिसकडे आकर्षित झालेल्या भारतीय युवकांच्या भारतीय व्यवस्थेबद्दल फारशा तक्रारी नाहीत. त्यांच्यात लष्कर, सुरक्षा दलाबद्दल कोणतीही सूड भावना नसल्याचेही आढळून आले. त्यातील बुहतेकांनी शिक्षण, रोजगार आणि कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुलीही दिली. 2जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, प. बंगाल, दिल्ली या राज्यांतील युवकांनी वेबवर आधारित कॉलिंग, मेसेजिंगचा वापर केला. ट्रिलियन, लाईव्ह, टांगो, ग्रुप मी, व्हायबर, हाईक, टॉकरे यांच्यासारख्या चॅटअ‍ॅपच्या माध्यमातून तसेच फेसबुक आणि टिष्ट्वटरच्या माध्यमातून संपर्क ठेवला.खिलाफतीचे युवकांवर गारूडयापूर्वी जैश-ए - मोहम्मद, इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए- तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अन्य संघटनांकडे आकर्षित झालेले युवक आता इसीसकडे वळण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. तपाससंस्थांनी चौकशीअंती तसे विश्लेषण केले आहे. अनेक भारतीय युवकांना इसिसचे आकर्षण वाटण्याचे कारण शरियत कायद्याच्या आधारावर खिलाफत राजवट आणण्याचे स्वप्न. पाश्चात्य राष्ट्रांनी मुस्लिमांवर वर्षानुवर्षे अत्याचार चालविल्याची भावना मुुस्लिमांमध्ये बळावत आहे. आधुनिक जगात अनेक सामाजिक वाईट कृत्यांवर मात करण्यास इसिसच्या नेतृत्वातील खिलाफत राजवटच उपाय शोधू शकते, या विचाराने या युवकांवर गारुड घातले होते, असे तज्ज्ञाने म्हटले. वेळीच अडकले गुप्तचर संस्थांच्या जाळ्यात...हिंसक कारवायांसाठी इसिसच्या भूभागात जाण्यासाठी प्रवासाची तयारी करण्यापूर्वीच गुप्तचर संस्थांनी अनेकांना ताब्यात घेत डाव उधळला. अलीकडेच एनआयएने दिल्लीत मुदब्बीर शेख याच्या नेतृत्वातील १८ सदस्यीय गटाच्या मुसक्या बांधल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्याविरुद्ध पहिले दोन आरोपपत्र दाखल होईल. इसिसमध्ये प्रत्यक्षात भरती झालेल्या ४९ जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. हे सर्वच जण हल्ले करण्याच्या किंवा इराक, सिरिया गाठण्याच्या पूर्व टप्प्यात होते.