शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

500 व 1 हजारच्या जुन्या नोटा बदलून देणार नाही- केंद्र सरकार

By admin | Updated: July 17, 2017 22:26 IST

आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ शकत नाही, असं स्पष्ट करत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ शकत नाही, असं स्पष्ट करत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं जुन्या नोटा बदलून देण्यासाठी केलेल्या सूचनेला केंद्रानं विरोध दर्शवला आहे. 500 आणि 1 हजारच्या जुन्या नोटा बदलून दिल्यास काळ्या पैशांवर अंकुश ठेवण्याचं आमचं ध्येय साध्य होणार नाही, असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. जुन्या नोटा बदलून दिल्यास बेहिशेबी व्यवहार आणि दुस-या व्यक्तीमार्फत नोटा जमा करण्याच्या प्रकारांना ऊत येईल. त्यामुळे काळा पैसा शोधणं सरकारला कठीण जाईल, असंही केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केलं आहे. 1978 साली नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यावेळी नोटा बदलून देण्यासाठी फक्त 6 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र आम्ही नोटा बदलून देण्यासाठी सर्वाधिक म्हणजेच 51 दिवसांची वेळ दिली होती. तसेच नोटाबंदीच्या दरम्यान पेट्रोल पंप, रेल्वे, एअरलाइन्स तिकीट बुकिंगसाठीही मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा वापरण्यात आल्या होत्या, अशी माहिती केंद्र सरकार म्हणालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यावेळी जुन्या नोटा जमा करू न शकलेल्यांसाठी एखादी खास सुविधा का उभारण्यात आली नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला विचारला होता. जे लोक एखाद्या कारणास्तव नोटा बँकेत जमा करू शकले नाहीत, त्यांची संपत्ती काढून घेण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही असंही न्यायालयाने ठणकावून सांगितलं होतं. सोबतच ज्या लोकांकडे पैसे जमा न करण्याचा वैध कारण आहे, त्यांना एक संधी दिली गेली पाहिजे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.आणखी वाचा(१ लाख बोगस कंपन्यांची नोंदणी नोटाबंदीनंतर रद्द)(नोटाबंदीनंतर आलेल्या ८३% नव्या नोटा चलनात)एका महिलेने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, ज्यांच्याकडे वैध कारण आहे त्यांना अजून एक संधी देण्यात आली नाही तर हा गंभीर मुद्दा ग्राह्य धरला जाईल. नोटाबंदी सुरू असताना एखादी व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत असेल, तर तो कसा काय नोटा बँकेत जमा करू शकत होता ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. अशा परिस्थितीत सरकारने अशा लोकांसाठी एखादी विशेष सुविधा सुरू करायला हवी असं मत न्यायालयाने व्यक्त केलं होतं.