शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

भारत शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पिछाडीवर - युनेस्कोचा अहवाल

By admin | Updated: September 6, 2016 08:09 IST

भारत प्राथमिक शिक्षणाचं ध्येय 2050, कनिष्ठ माध्यमिक शिक्षणाचं ध्येय 2060 आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचं ध्येय 2085 मध्ये पुर्ण करेल असं अहलावात नमूद करण्यात आलं आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारत सर्वांना शिक्षण पुरवण्याच्या ध्येयामध्ये 50 वर्ष पिछाडीवर असल्याचा अहवाल युनेस्कोने दिला आहे. याचा अर्थ भारत प्राथमिक शिक्षणाचं ध्येय 2050, कनिष्ठ माध्यमिक शिक्षणाचं ध्येय 2060 आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचं ध्येय 2085 मध्ये पुर्ण करेल असं अहलावात नमूद करण्यात आलं आहे.
 
भारताला शाश्वत विकास ध्येय गाठायचं असेल तर शिक्षण क्षेत्रात मुलभूत बदल करण्याची गरज आहे. तेव्हाच 2030 पर्यंत ध्येय पुर्ण होऊ शकेल असं ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (जीईएम) अहवालात सांगण्यात आलं आहे. अहवालात  सांगण्यात आल्याप्रमाणे भारतात 6 कोटींहूनही जास्त मुलांना कमी किंवा अजिबात शिक्षण मिळत नाही. तर 11 लाख मुलं कनिष्ठ माध्यमिक स्तरावर असताना शिक्षण सोडून देतात, आणि हा आकडा जगातील कोणत्याही देशाशी तुलना करता उच्चांक आहे. 
 
उच्च माध्यमिक स्तरावरील 4 कोटी 68 लाख मुलं शाळेतच जात नाहीत. तर 29 लाख मुलं प्राथमिक शिक्षणापासूनच दूर आहेत. अहवालानुसार भारतात 2020 मध्ये 4 कोटी कामगार असे असतील ज्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणच घेतलं नसेल.
 
अहवालात सांगितल्याप्रमाणे जगभरातील 40 टक्के विद्यार्थ्यांना अशी भाषा शिकवली जाते जी त्यांना कळतच नाही. एकीकडे जगातील अर्ध्या शाळांमध्ये वातावरणातील बदलांवर शिक्षण दिलं जात नसताना भारतात 30 कोटी विद्यार्थ्यांना हवामानाबद्दल शिक्षण दिलं जात आहे.