शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गंगा नदीत कचरा फेकल्यास 50 हजार रुपये दंड

By admin | Updated: July 13, 2017 18:06 IST

हरिद्वार-उन्नाव या पट्टयातून वाहणा-या गंगा नदीत कचरा फेकणा-यांना 50 हजार रुपये दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 13 - गंगा स्वच्छतेसाठी राष्ट्रीय हरीत लवादाने विविध उपाययोजना सूचवल्या असून, यामध्ये हरिद्वार- उन्नाव पट्टयातून वाहणा-या गंगा नदीत कचरा फेकणा-यांना 50 हजार रुपये दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय हरीत लवादाच्या खंडपीठाने कचरा फेकणा-यांना 50 हजार रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 
 
गंगा नदीच्या हरिद्वार-उन्नाव पट्ट्यातील 500 मीटरच्या परिसरात कचरा फेकण्याची परवानगी देऊ नये अशीही शिफारस करण्यात आली आहे. याच पट्टयातील गंगा नदीच्या किना-यापासून 100 मीटरचा परिसर नो डेव्हलपमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड सरकारला गंगा नदीच्या घाटांवर होणा-या विविध धार्मिक विधी-पूजांसाठी मार्गदर्शकतत्वे आखण्याचेही निर्देश दिले आहेत तसेच उत्तरप्रदेश सरकारने जाजमाऊ येथील चामडयाचे कारखाने सहा आठवडयांच्या आत उन्नाव किंवा अन्य स्थळी हलवावेत असे निर्देशात म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
मोदी तेरी गंगा मैली
उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथे गंगा नदी किनारी आढळले १०० मृतदेह
पंढरपूरातील गरिबांचा विठ्ठल बनला कोट्याधीश
 
एप्रिल महिन्यात उत्तरप्रदेश सरकारने गंगा किना-याजवळचे ब्रिटीश काळापासूनचे चामडयाचे कारखाने कानपूर येथे हलवण्यास अनुकूलता दाखवली होती. चामडयांच्या कारखान्यांना दुस-या ठिकाणी स्थानांनतरीत करण्यासाठी जागेचा शोध सुरु असल्याचे उत्तरप्रदेश सरकारने हरीत लवादाला सांगितले होते. गंगेमध्ये मोठया प्रमाणावर होणा-या प्रदूषणाला हे चामडयांचे कारखाने कारणीभूत आहेत. 
 
543 पानाच्या या निकालपत्रात राष्ट्रीय हरीत लवादाने गंगा स्वच्छतेसाठी अनेक निर्देश दिले आहेत. एनजीटीने निरीक्षकांची एक समिती बनवली असून, त्यांना  अंमलबजावणीच्या प्रगतीसंदर्भात अहवाल देण्यास सांगितला आहे. गंगा सफाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. 
 
एप्रिल महिन्यात गंगा नदीला स्वच्छ करण्यासाठी आखलेली 300 कोटींची योजना फक्त कागदावरच राहिली असल्याची माहिती समोर आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर गंगा नदी स्वच्छतेसाठी 300 कोटी खर्च करणार असल्याचं सांगितलं होतं. 2020 पर्यंत गंगा स्वच्छ करणार असल्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं होतं. मात्र एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान यासाठी फक्त 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.