शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

५० टक्के भारतीय करतात स्वत:च उपचार

By admin | Updated: April 9, 2015 00:46 IST

स्वत:ची औषधे स्वत:च निवडणे ही अत्यंत धोकादायक सवय असून, भारतातील ५२ टक्के लोक स्वत:च अशी औषधांची निवड करतात असा यासंदर्भातील अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

नवी दिल्ली : स्वत:ची औषधे स्वत:च निवडणे ही अत्यंत धोकादायक सवय असून, भारतातील ५२ टक्के लोक स्वत:च अशी औषधांची निवड करतात असा यासंदर्भातील अभ्यासाचा निष्कर्ष आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टरांनी केलेल्या रुग्णांच्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे. लिब्रेट नावाच्या व्यासपीठाअंतर्गत मार्च महिन्यापासून देशातील १० शहरांत हा अभ्यास करण्यात आला असून २० हजार नागरिकांच्या सवयी पाहून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आरोग्य सेवा सरसंचालक जगदीश प्रसाद यासंदर्भात बोलताना म्हणाले की, दैनंदिन जीवनात अनेक भारतीय स्वत:च्या आजारावर स्वत:च औषधे घेतात. पण ही सवय आरोग्याची मोठी समस्या निर्माण करू शकते, त्यामुळे ती बंद केली पाहिजे. भारतात प्रत्येकजण स्वत:ला आरोग्य तज्ज्ञ समजतो. स्थानिक औषध दुकानदार ते बसमध्ये बरोबर प्रवास करणारा सहप्रवासी तुम्हाला विविध आजारावरील औषधाबाबत सल्ला देतो. वरवर पाहता ही औषधे फारशी धोकादायक नसतात, पण नंतर कधीतरी त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. अँटीबायोटिक औषधांचा पूर्ण कोर्स न घेण्याची पद्धतही यातच मोडते. यामुळे अँटीबायोटिक औषधांना प्रतिकारक क्षमता शरीरात तयार होते. स्वत:च उपचार करण्यात हाही एक धोका आहेच. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने अशा कुप्रथा सुरू होतात, देशात ८ लाख आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांची सेवा योग्य त्या पद्धतीने वापरली जात नाही, असे या सर्वेक्षणातून दिसून आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)