शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
5
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
6
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
7
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
8
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
9
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
10
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
11
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
12
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
13
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
14
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
15
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
16
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
17
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
18
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
19
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
20
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!

५० टक्के भारतीय करतात स्वत:च उपचार

By admin | Updated: April 9, 2015 00:46 IST

स्वत:ची औषधे स्वत:च निवडणे ही अत्यंत धोकादायक सवय असून, भारतातील ५२ टक्के लोक स्वत:च अशी औषधांची निवड करतात असा यासंदर्भातील अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

नवी दिल्ली : स्वत:ची औषधे स्वत:च निवडणे ही अत्यंत धोकादायक सवय असून, भारतातील ५२ टक्के लोक स्वत:च अशी औषधांची निवड करतात असा यासंदर्भातील अभ्यासाचा निष्कर्ष आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टरांनी केलेल्या रुग्णांच्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे. लिब्रेट नावाच्या व्यासपीठाअंतर्गत मार्च महिन्यापासून देशातील १० शहरांत हा अभ्यास करण्यात आला असून २० हजार नागरिकांच्या सवयी पाहून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आरोग्य सेवा सरसंचालक जगदीश प्रसाद यासंदर्भात बोलताना म्हणाले की, दैनंदिन जीवनात अनेक भारतीय स्वत:च्या आजारावर स्वत:च औषधे घेतात. पण ही सवय आरोग्याची मोठी समस्या निर्माण करू शकते, त्यामुळे ती बंद केली पाहिजे. भारतात प्रत्येकजण स्वत:ला आरोग्य तज्ज्ञ समजतो. स्थानिक औषध दुकानदार ते बसमध्ये बरोबर प्रवास करणारा सहप्रवासी तुम्हाला विविध आजारावरील औषधाबाबत सल्ला देतो. वरवर पाहता ही औषधे फारशी धोकादायक नसतात, पण नंतर कधीतरी त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. अँटीबायोटिक औषधांचा पूर्ण कोर्स न घेण्याची पद्धतही यातच मोडते. यामुळे अँटीबायोटिक औषधांना प्रतिकारक क्षमता शरीरात तयार होते. स्वत:च उपचार करण्यात हाही एक धोका आहेच. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने अशा कुप्रथा सुरू होतात, देशात ८ लाख आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांची सेवा योग्य त्या पद्धतीने वापरली जात नाही, असे या सर्वेक्षणातून दिसून आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)