शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

उत्तर प्रदेशातील ५० जिल्हे भूकंपप्रवण; धोक्याची घंटा

By admin | Updated: May 1, 2015 01:58 IST

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने सीमेवरील उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा दिला आहे. या राज्यातील एकूण ७५ जिल्ह्णांपैकी ५० जिल्हे भूकंपप्रवण आहेत.

लखनौ : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाने सीमेवरील उत्तर प्रदेशलाही धोक्याचा इशारा दिला आहे. या राज्यातील एकूण ७५ जिल्ह्णांपैकी ५० जिल्हे भूकंपप्रवण आहेत.गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (एनआयडीएम) झोन ४ अंतर्गत भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या २९ जिल्ह्णांची यादी तयार केली आहे. संस्थेने राज्याचे तीन क्षेत्रात विभाजन केले आहे. नेपाळ आणि उत्तराखंडमधील उत्तरकाशीला लागून असलेल्या भागाचा समावेश झोन-४ मध्ये करण्यात आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता बघितल्यानंतर उत्तर प्रदेश भूकंपापासून किती सुरक्षित आहे, याचा नव्याने विचार करण्याची गरज शास्त्रज्ञांना वाटली. कारण या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेशालाही बसले होते. नेपाळमधील भूकंपानंतर बाराबंकी, कुशीनगर, संत कबीरनगर, बदायू, श्रावस्ती, बलिया आणि गोरखपूर जिल्ह्णात अनेक हादरे बसले.‘उत्तर प्रदेशातील वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात फार मोठी जीवहानी होऊ शकते. यावेळी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के सुदैवाने राज्यात तेवढ्या तीव्रतेने जाणवले नाहीत. परंतु राज्यात नियमांचे पालन होत नाही. उंच इमारती भूकंपरोधी असणे अत्यावश्यक आहे’, अशी माहिती भूकंप विशेषज्ञ आणि भारतीय भूसर्वेक्षण विभागाचे माजी संचालक व्ही.के. जोशी यांनी दिली.उत्तर प्रदेशात ८० वर्षात प्रथमच अशाप्रकारचे धक्के अनुभवण्यास आले. उत्तर आणि पश्चिम भागात अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा परिणाम जास्त जाणवतो. नेपाळ: मदतीचा ओघ सुरूचभारतातर्फे नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच असून गुरुवारी ८,४५० तंबू नेपाळला पाठविण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार विविध निमलष्करी दलांकडून हे तंबू घेण्यात आले आहेत. यापैकी ७५० तंबू विमानाने पाठविण्यात आले. भूकंपात घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना या तंबूंचे वाटप केले जाईल.‘भूकंपग्रस्त नेपाळच्या गरजेनुसार आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. भारतीय वायुसेनेलासुद्धा त्यांच्या मागणीनुसार मदत करण्यास सांगण्यात आले आहे आणि मदत मोहिमेचा वेगही त्या देशाच्या इच्छेवर अवलंबून असेल.’मनोहर पर्रीकरसंरक्षण मंत्री४पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून भारतात नुकत्याच आलेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. मोदी यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. शरीफ यांनी नेपाळमधील बचाव कार्यात भारताद्वारे करण्यात येत असलेल्या मदतीचीही प्रशंसा केली. सार्क देशांनी आपत्तीतील बचाव व मदतीवर नियमित संयुक्त सराव केला पाहिजे,अशी सूचना शरीफ यांनी केली.