शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

झोपेतून उठवले नाही म्हणून रेल्वेला ठोठावला 5 हजाराचा दंड

By admin | Updated: April 29, 2017 12:46 IST

रेल्वेने स्टेशन येण्याआधी वेकअप कॉल दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 5 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. 29 - रेल्वेने स्टेशन येण्याआधी वेकअप कॉल दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने रेल्वेला 5 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. मध्यप्रदेशच्या बेतुल जिल्ह्यातील गिरीश गर्ग 13 जून 2015 रोजी कोईमबतूर-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसने कोटा येथे चालले होते. रात्री 1.40 ही ट्रेनची कोटा येथे पोहोचण्याची नियोजित वेळ होती. 
 
गिरीश गर्ग यांनी त्यांच्या मोबाईलवरुन रेल्वेच्या 139 क्रमांकावर फोन करुन ग्राहक सेवा अधिका-याला स्टेशन येण्याआधी वेकअप कॉल देण्यास सांगितला. रेल्वेने प्रवाशांसाठी 139 क्रमांकावर वेकअप कॉलची सुविधा दिली आहे. तुम्ही मोबाईलवरुन ग्राहक सेवा कक्षाला कळवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर स्टेशनजवळ आल्यानंतर कॉल येतो. प्रवाशांना ज्या स्टेशनवर उतरायचे आहे तिथेच उतरता यावे यासाठी रेल्वेने ही वेकअप कॉलची सुविधा सुरु केली आहे. 
 
गिरीश गर्ग यांना ग्राहकसेवा अधिका-याने तुमचा नंबर रजिस्टर झाला असून, स्टेशन येण्याआधी तुमच्या मोबाईलवर कॉल येईल असे सांगितले. त्यामुळे गर्ग निर्धास्तपणे झोपून गेले. पण गर्ग यांच्या मोबाईलवर ना मेसेज आला, ना कुठला कॉल. कोटा स्थानक आल्यानंतर गर्ग यांना जाग आली पण ट्रेनमधून उतरताना त्यांची धावपळ झाली. 
 
त्यानंतर गिरीश गर्ग यांनी रेल्वेच्या या बेजबाबदारपणाबद्दल ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. मला जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल रेल्वेने 20 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली. रेल्वेने न्यायालयात आपली बाजू मांडताना सांगितले की, 139 क्रमांकाच्या सुविधेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे ही याचिका रद्द करावी असे रेल्वेने सांगितले. 
 
पण ग्राहक न्यायालयाला रेल्वेचा दावा पटला नाही. 26 एप्रिल 2017 रोजी न्यायालयाने  रेल्वेला गर्ग यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 5 हजार रुपये नुकसानभरपाई आणि 2 हजार रुपये कायदेशीर लढाईचा खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले.