शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

"5 कोटी मुस्लिम म्हणतात ट्रिपल तलाकमध्ये हस्तक्षेप नको"

By admin | Updated: April 18, 2017 09:02 IST

एकीकडे ट्रिपल तलाक प्रथा रद्द व्हावी यासाठी लढा चालू असताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तब्बल पाच कोटी मुस्लिमांचं या प्रथेला असल्याचा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - एकीकडे ट्रिपल तलाक प्रथा रद्द व्हावी यासाठी लढा चालू असताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तब्बल पाच कोटी मुस्लिमांचं या प्रथेला असल्याचा दावा केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केलेल्या दाव्यानुसार पाच कोटी मुस्लिमांनी सही करत समान नागरी कायद्याच्या नावाखाली ट्रिपल तलाक प्रथेत हस्तक्षेप करु नये असं सांगितलं आहे. यामध्ये मुस्लिम महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद रहमानी यांनी मेल टुडेला दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध राज्यातील एकूण 4 कोटी 83 लाख 47 हजार 596 मुस्लिमांनी सह्या करुन आपला पाठिंबा दर्शवला आहे.
 
(संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी)
("ट्रिपल तलाक पीडित महिलांनी हिंदू धर्म स्वीकारा")
 
समान नागरी कायद्यासंबंधी आपलं मत व्यक्त करण्यासाठी पर्सनल लॉ बोर्डाने सविस्तर प्रश्नावली तयार केली असून आतापर्यंत 40 हजार लोकांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. कायदा आयागोचे अध्यक्ष जस्टीस बलबीर सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रतिनिधीमंडळाने एक हार्ड डिस्क सोपवली. स्वाक्षरी करण्यात आलेल्या सर्व्हे फॉर्म्सच्या स्कॅन कॉपी या हार्ड डिस्कमध्ये होत्या. मौलाना मोहम्मद रहमानी यांनी या प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व केलं. दरम्यान मौलाना मोहम्मद रहमानी यांनी मूळ कागदपत्रे हवी असल्यास दोन ट्रक भरुन आपण पाठवू शकतो असं सांगितलं आहे. 
 
सामाजिक सुधारणांच्या नावाखाली वैयक्तिक कायद्यांचे पुनर्लेखन केले जाऊ शकत नाही. हा धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा असल्याने न्यायालय त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असे सांगून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीन तलाक (या शब्दाचा तीनदा उच्चार करून घटस्फोट देणे) प्रथेचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले होते. मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात या प्रथेला आव्हान दिले. ही प्रथा घटनाविरोधी असल्याचा तिचा दावा आहे.  
 
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
‘वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे,’ असे मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.