शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

"5 कोटी मुस्लिम म्हणतात ट्रिपल तलाकमध्ये हस्तक्षेप नको"

By admin | Updated: April 18, 2017 09:02 IST

एकीकडे ट्रिपल तलाक प्रथा रद्द व्हावी यासाठी लढा चालू असताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तब्बल पाच कोटी मुस्लिमांचं या प्रथेला असल्याचा दावा केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - एकीकडे ट्रिपल तलाक प्रथा रद्द व्हावी यासाठी लढा चालू असताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तब्बल पाच कोटी मुस्लिमांचं या प्रथेला असल्याचा दावा केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केलेल्या दाव्यानुसार पाच कोटी मुस्लिमांनी सही करत समान नागरी कायद्याच्या नावाखाली ट्रिपल तलाक प्रथेत हस्तक्षेप करु नये असं सांगितलं आहे. यामध्ये मुस्लिम महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद रहमानी यांनी मेल टुडेला दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध राज्यातील एकूण 4 कोटी 83 लाख 47 हजार 596 मुस्लिमांनी सह्या करुन आपला पाठिंबा दर्शवला आहे.
 
(संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी)
("ट्रिपल तलाक पीडित महिलांनी हिंदू धर्म स्वीकारा")
 
समान नागरी कायद्यासंबंधी आपलं मत व्यक्त करण्यासाठी पर्सनल लॉ बोर्डाने सविस्तर प्रश्नावली तयार केली असून आतापर्यंत 40 हजार लोकांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. कायदा आयागोचे अध्यक्ष जस्टीस बलबीर सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रतिनिधीमंडळाने एक हार्ड डिस्क सोपवली. स्वाक्षरी करण्यात आलेल्या सर्व्हे फॉर्म्सच्या स्कॅन कॉपी या हार्ड डिस्कमध्ये होत्या. मौलाना मोहम्मद रहमानी यांनी या प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व केलं. दरम्यान मौलाना मोहम्मद रहमानी यांनी मूळ कागदपत्रे हवी असल्यास दोन ट्रक भरुन आपण पाठवू शकतो असं सांगितलं आहे. 
 
सामाजिक सुधारणांच्या नावाखाली वैयक्तिक कायद्यांचे पुनर्लेखन केले जाऊ शकत नाही. हा धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा असल्याने न्यायालय त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असे सांगून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीन तलाक (या शब्दाचा तीनदा उच्चार करून घटस्फोट देणे) प्रथेचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले होते. मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात या प्रथेला आव्हान दिले. ही प्रथा घटनाविरोधी असल्याचा तिचा दावा आहे.  
 
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
‘वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे,’ असे मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.