शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ला ५ कोटी दंड

By admin | Updated: March 10, 2016 04:11 IST

शुक्रवारपासून तीन दिवस यमुनेच्या पात्रात अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेला जागतिक सांस्कृतिक महोत्सव रोखण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बुधवारी नकार दिला

यमुना पात्राची नासाडी : हरित न्यायाधिकरणाचा आदेशनवी दिल्ली : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग फाउंडेशन’ने येत्या शुक्रवारपासून तीन दिवस यमुनेच्या पात्रात अतिभव्य प्रमाणावर आयोजित केलेला जागतिक सांस्कृतिक महोत्सव रोखण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बुधवारी नकार दिला. मात्र या महोत्सवासाठी एक हजार एकरांहून अधिक जागेवर विनापरवाना बांधकाम करून यमुना पात्राची जी नासाडी करण्यात आली आहे तिची भरपाई करण्याची सुरुवातीची रक्कम म्हणून फाउंडेशनने पाच कोटी रुपये लगेच जमा करावे, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला.एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे यमुना खोऱ्याचे पर्यावरण, परिसंस्था, जैवविविधता आणि जलचरजीवन यांचे जे नुकसान होत आहे त्यास फाउंडेशनच संपूर्णपणे जबाबदार असेल, असा निष्कर्षही न्यायाधिकरणाने काढला आणि याची भरपाई करून यमुना खोरे पूर्वपदावर आणण्यासाठी जो काही खर्च येईल तो सर्व फाउंडेशनलाच करावा लागेल, असेही बजावले. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेणे व खोऱ्याच्या पुनरुज्जीवनाची योजना तयार करणे यासाठी न्यायाधिकरणाने एक तज्ज्ञ समितीही नेमली. पर्यावरणाच्या हानीची भरपाई म्हणून फाउंडेशनने अंतिमत: एकूण किती रक्कम द्यायची हे नंतर ठरविले जाईल, असे स्पष्ट केले गेले. याची सुरुवातीची रक्कम म्हणून फाउंडेशनने पाच कोटी रुपये कार्यक्रम सुरू होण्याआधी जमा करावे व नंतर ठरणाऱ्या अंतिम रकमेचा उर्व रित हिस्साही अदा करण्याची लेखी हमी दोन आठवड्यांत सादर करावी, असेही न्यायाधिकरणाने सांगितले.कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले ४० फूट उंच, एक हजार फूट लांब व २०० फूट रुंद अशा महाकाय व्यासपीठासह इतर सर्वच हंगामी बांधकामांची सुरक्षितता आणि मजबुती याविषयी खातरजमा करून घेतल्याखेरीज व सर्व संबंधित विभागांकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन त्यातील अटींची पूर्तता केल्याखेरीज कार्यक्रम सुरु करता येणार नाही, असेही न्यायाधिकरणाने फाऊंडेशनला बजावले.याखेरीज दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळ या वैधानिक संस्थांनी त्यांचे कर्तव्यपालन न केल्याबद्दल त्यांनाही अनुक्रमे पाच लाख व एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.फाऊंडेशनच्या या कार्यक्रमाविरुद्ध मनोज मिश्रा, प्रमोद कुमार त्यागी, आनंद आर्य व ओजस्वी पार्टी इत्यादींनी याचिका केल्या होत्या. अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार व सदस्य न्या. एम.एस. नाम्बियार, डॉ. डी. के. अग्रवाल व बिक्रम सिंह सजवान यांचा समावेश असलेल्या न्यायाधिकरणाच्या मुख्यपीठाने गेल्या दोन दिवसांच्या सुनावणीनंतर वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. एक तर अर्जदार फार उशिरा व ऐनवेळी आल्याने नियोजित कार्यक्रम आता अटळ असल्यासारखा आहे. शिवाय त्याने पर्यावरणाची जी काही हानी होईल ती भरून निघण्यासारखी आहे, असे नमूद करून न्यायाधिकरणाने कार्यक्रमाला मनाई न करता हा आदेश दिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)